अकोला : गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपयांचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले होते. सदर धान्याचे वाटप केल्यानंतर सुद्धा दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा करावी लागत आहे. कमिशन मिळत नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये नाराजी आहे, अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी दिली आहे.
त्यानंतर सदर योजनेला शासनाने नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यासह पाच किलो तांदुळा येवजी लाभार्थ्याना तीन किलो मोफत गहू व दोन किलो मोफत तांदुळ देण्याचे जाहीर केले. सदर धान्याचे वाटप मोफत होत असल्याने केंद्राकडून आलेल्या अतिरिक्त तांदुळाच्या बदल्यात रेशन दुकानदारांना कमिशन मिळावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांनी केली होती. ही मागणी शासनाने मंजुर केली होती व रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल मागे १५० रुपये कमिशन जाहीर केले होते. परंतु रेशन दुकानदारांनी धान्य वितरण केल्यानंतर सुद्धा त्यांना कमिशनसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. (संपादन - विवेक मेतकर) वातावरणात बदललय, आर्द्रतेचाही वाढला टक्का | |||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.