Well-Work 
अ‍ॅग्रो

राज्यात ७६ हजारांवर विहिरींची कामे अर्धवट

हरी तुगावकर

लातूर - समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत ४१ हजार ६६१ विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. सध्या राज्यात ७६ हजार ६८९ विहिरींची कामे रखडली आहेत. या `समृद्ध महाराष्ट्र` योजनेत मराठवाडा फारच मागे आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २९ हजार ७१९ विहिरींची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शासनाने आता पावसाळ्याच्या आधी ही कामे पूर्ण व्हावीत, याकरिता मुदतवाढ दिली असून एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत सिंचन विहिरीचे कामे पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

 राज्य शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरू केली. याअंतर्गत गावागावांत सिंचन विहिरी व्हाव्यात याकरीरिता अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रम शासनाने सुरू केला आहे. या विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय व्हावी हा या मागचा उद्देश होता; पण या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरींच्या कामांना मार्चअखेरपर्यंतची मुदत होती. पण पैसा उपलब्ध असूनही ही कामे झाले नसल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. यातूनच राज्यात ७६ हजार ६८९ विहिरींचे कामे अद्यापही रखडलेली आहेत. या समृद्ध महाराष्ट्र योजनेत मराठवाडा तर फारच मागे आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २९ हजार ७१९ विहिरींची कामे रखडलेली आहेत. यात साडेनऊ हजार विहिरींचे काम; तर केवळ २५ टक्केपर्यंतच झाले आहे. त्यामुळे अधिकारी याकडे किती गांभिर्याने पाहत आहेत हेच लक्षात येत आहे.

या योजनेच्या कामात अडचणी असल्याच्या लाभार्थी व लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विहिरी अपूर्ण असण्याची कारणे शोधून त्यावर तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आता एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत विशेष मोहीम शासनाने हाती घेतली आहे.

मराठवाड्यात जिल्हानिहाय अर्धवट अवस्थेत असलेल्या विहिरींची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हा---२५ टक्के झालेले काम---२५ ते ५० टक्के झालेले काम--५० ते ७५ टक्के झालेले काम-७५टक्के झालेले काम

औरंगाबाद--१४८५--------९००--------६५१----------८४४
बीड--------२५५६------१९८०---------१९७६------१६६३
हिंगोली----६७७---------२०५---------९३---------७३
जालना-----१२२२--------८१९---------८०९---------५९२
लातूर-----५५९---------७२१---------१५४१---------५७१
नांदेड------१२९२--------११७२--------८१६---------३८५
उस्मानाबाद---४२०--------२८९---------२९३--------२३१
परभणी------१४०१--------११२६---------११३४--------१२१८
एकूण-----९६१२---------७२१२------------७३१३--------५५८२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT