brinjal 
अ‍ॅग्रो

सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीला उठाव

सुदर्शन सुतार

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीची आवक कमी राहिली. पण, मागणी असल्याने  चांगला उठाव मिळाला. त्याशिवाय मेथी, कोथिंबिरीचे दरही तेजीत राहिले. 

बाजार समितीत आद्यापही शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू आहे. गतसप्ताहात रोज वांग्यांची ३० ते ५० क्विंटलपर्यंत आणि हिरव्या मिरचीची १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक झाली. त्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. वांग्यांना प्रतिक्विंटलाला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, दोडका यांचे दरही काहीसे तेजीत राहिले. टोमॅटोला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, तर दोडक्याला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. 

भाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर आणि शेपूला उठाव मिळाला. त्यांची आवकही रोज प्रत्येकी ५ ते ७ हजार पेंढ्यांपर्यंत झाली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ६०० ते १५०० रुपये, कोथिंबिरीला ८०० ते १२०० रुपये आणि शेपूला ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. कांद्यांची आवक आणि लिलाव सप्ताहातून फक्त सोमवार आणि गुरुवार दोनच दिवस होतात. त्यातही कांद्याची आवक तुलनेने कमीच आहे. कांद्यांना प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT