मुंबई - ‘कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. तर, ‘‘कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘धोक्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कृषी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल. कोरोनाचे संकट लक्षात घेता बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी राज्य, देशच नव्हे तर जगाची भूक भागवावी.’’
कापूस खरेदी २० जूनपर्यंत
राज्यात ४१० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत ३४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस १५ ते २० जून पर्यंत खरेदी केला जाणार आहे. दररोज दोन लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.
खरीप हंगाम २०२० नियोजन
कापूस पिकाखालील प्रस्तिवात क्षेत्र
प्रमुख पिके
कोरडवाहू क्षेत्र ८१ टक्के
सरासरी पर्जन्यमान ११९८ मि.मि.
कोरडवाहू क्षेत्र ८१ टक्के
एकूण शेतकरी १.५२ कोटी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.