The administration did the work only after the suggestion of MLA Radhakrishna Vikhe Patil 
अहिल्यानगर

आमदार विखे पाटलांच्या सुचनेनंतरच प्रशासनाला जाग

सुहास वैद्य

कोल्हार (अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोल्हार राजुरी रस्त्या लगतच्या चराच्या खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे. या प्रश्नात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे. तोपर्यंत या परिसरातील शेतजमिनी, अंतर्गत रस्ते व नागरी वसाहतींचे काही नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहे. पावसाच्या पाण्यामुळे निर्माण होणारा हा प्रश्न दरवर्षीचाच आहे.

तीन वर्षापूर्वी विखे पाटील यांनी यात असेच लक्ष घातले होते. तसेच चराच्या दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या होत्या. त्यावेळी कमी पावसाचा अपवाद वगळता या भागाचा पावसाच्या पाण्याच्या अडलेला प्रवाह शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असतो. 

गेल्या आठवड्यात तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पुन्हा विखे पाटील यांना साकडे घातले. त्याची दखल घेत त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पहाणी केली. वाड्यावस्त्यावरील ओढे नाले चर बुजविले गेल्याने शेतातील पावसाच्या पाण्याची विल्हेवाट रोखली.  हे चर उकरून आवश्यक त्याठिकाणी नळ्या टाकण्याचे तसेच कमी व्यासाच्या नळ्या असलेल्या ठिकाणी मोठ्ठ्या आकाराच्या नळ्या टाकण्याचे काम त्वरित सुरु करावे. सार्वजनिक विषयात गावकऱ्यांनी सहकार्य करावे. अशी अपेक्षा व्यक्त करतानाच चर उकरताना जे कोणी आडवे येतील, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना विखे पाटील यांनी राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. आर. वर्पे यांना दिल्या.

केवळ राजुरी रस्त्याचेच नव्हे तर बनकर फाटा व तिसगाव रस्ताच्याही शेताकडील बुजविलेले चर साईड गटारे उकरून काढावीत. चर उकरण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने तत्काळ सुरु करावे. पाण्याचा अडलेला नैसर्गिक प्रवाह मोकळा करून पाणी प्रवरा नदीला जाईल याची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने उपाय योजना करावी, अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नुकसानग्रस्त भागाच्या पहाणी दरम्यान उपस्थित शेतकरी व गावकऱ्यांनी त्यांच्या पुढे दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येविषयी प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या. त्याची विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. चराच्या खोदाईला सुरवात झाली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोकळा झाल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होवू शकते.

शेतातील पाणी वाहून जाऊ लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करू लागले आहेत. 
अतिक्रमित चरामुळे ज्यांचे नुकसान झाले फक्त तेच लोक स्वत: उभे राहून चराची खोदाई करून घेत असल्याचे चित्र त्याठिकाणी दिसत होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील पहाणी करायला आल्यावर ज्या पुढारी मंडळीची त्यांच्याजवळ जाण्यासाठी धडपड सुरु होती. त्यापैकी एखादा दुसरा अपवाद वगळता खोदाईच्या कामाकडे कोणीही ढुंकून बघितले नाही. याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT