Zilla Parishad 
अहिल्यानगर

अहमदनगर जिल्हा परिषदेत बदल्या फक्त नावालाच!

सकाळ डिजिटल टीम

नगर : ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत दर वर्षी बदल्या केल्या जात आहेत; परंतु बदली झाल्यानंतर काही कर्मचारी नव्या ठिकाणी जाण्याऐवजी मूळ जागेवरच राहत आहेत. यासाठी अनेकांनी ‘सेवाउपलब्धता’चा आधार घेतला आहे. हा प्रकार थांबवून प्रशासनाने बदली झालेल्यांना सरसकट नियुक्तीच्या ठिकाणी पाठवावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. (After transfer Zilla Parishad employees are working in the same place in ahmednagar)

जिल्हा परिषदेतील बदल्यांची प्रक्रिया दर वर्षी पारदर्शक पद्धतीने पार पडते. नगर जिल्हा परिषदेने बदल्यांच्या प्रक्रियेत नेहमीच राज्यात वरचष्मा मिळविलेला आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी कोरोना संकटात नगर जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदल्या करून राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचे अनुकरण राज्यभर करण्यात आले. बदल्यांच्या प्रक्रियेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कौतुक केले आहे; मात्र या कामगिरीवर दर वर्षी होणाऱ्या सेवाउपलब्धतेमुळे पाणी फेरले जात आहे. अनेक कर्मचारी बदली होऊनही मूळ जागी राहण्यासाठी सेवाउपलब्धतेचा वापर करून तेथेच राहत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून असे काही जण त्याच जागी आहेत.

प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सेवाउपलब्धता रद्द करणे गरजेचे असतानाही, त्याबाबत कुठलीच ठोस कारवाई होत नाही. बदल्या करूनही सेवाउपलब्धतेने मोजके कर्मचारी मूळ जागेवर राहत असतील, तर बदल्यांचा ‘फार्स’ प्रशासन नेमका कशासाठी करते, असा सवाल आता कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सेवाउपलब्धतेचा पडलेला पायंडा प्रशासन या वर्षी तरी थांबवील का, असा थेट सवाल आता कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

(After transfer Zilla Parishad employees are working in the same place in ahmednagar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT