Anna expressed her views on Ralegan Siddhi
Anna expressed her views on Ralegan Siddhi 
अहमदनगर

अण्णांची राळेगण सिद्धीबाबत भूमिका ः अगोदर बिनविरोधसाठी प्रयत्न, आता निवडणुकीचे स्वागत

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : आम्ही लोकशाही स्वीकारली असल्याने लोकशाहीत प्रत्येक मतदाराला निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदानाचा मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. निवडणूक होणे हा दोष नाही आणि निवडणूक लढवणेपण दोष नाही.

फक्त निवडणुकीतील दोष बाजूला करणे गरजेचे आहे. निवडणुकीत भांडणे, हाणामा-या न होता शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने निवडणूक होणे महत्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले.

राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हजारे ई सकाळशी बोलताना हजारे म्हणाले की, सन 1857 ते 1947 या नव्वद वर्षांच्या काळात भारतात लोकशाहीसाठी लोकांनी संघर्ष केला आहे. काही लोक फासावर गेले, काहींना तुरूंगवास झाला तर काही भूमिगत झाले.

इंग्रजांच्या हुकूमशाहीला लोक कंटाळले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून लोकशाही अस्तित्वात आली असून त्यांच्या त्यागाची जाणीव कार्यकर्ते व सर्व मतदारांनी ठेवली पाहिजे. निवडणुकीत फक्त मटण व दारू नको. निवडणुकीत दारू मटणाच्या अमिषाला बळी पडलेली तरूण पिढी व्यसनी होऊन त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतात. हा दोष दूर केला पाहिजे.

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गट-तट, राजकीय संघर्षाचे लोण पाच वर्ष राहते. दोन गटांत होणारे मतभेद, कटूता टाळण्यासाठी ग्रामविकासासाठी एकजूट होण्यासाठी बिनविरोध निवडणुकांना आपण पाठिंबा दिला होता. राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. 
- अण्णासाहेब हजारे, जेष्ठ समाजसेवक
 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT