anna hazare Google
अहिल्यानगर

‘लोकायुक्त’साठी अण्णा हजारे आक्रमक; राज्य सरकारला दिला अल्टिमेटम

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (जि. नगर) : जनतेला सर्वाधिकार मिळाल्याने देशात स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा प्रभावी व सक्षम कायदा आहे. जनतेने जर मुख्यमंत्री, आमदार, अधिकारी यांच्याविरोधात लोकायुक्ताकडे पुरावे दिले, तर त्यांची चौकशी करून कारवाई करतील इतका प्रभावी कायदा आहे. मात्र, राज्य सरकार चालढकल करीत असल्याने, त्यांना तीन महिन्यांचा कालावधी देत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात वयाच्या ८५व्या वर्षी लोकायुक्त कायद्यासाठी राज्य सरकारविरोधात उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘सकाळ'शी बोलताना दिला.


हजारे म्हणाले, की देशातल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त अत्यंत महत्त्वाचे आहेत. केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा संसदेत पास झाला. संसदेत लोकपाल कायद्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन बोलावून कायदा पास झाला.लोकपाल कायदा केंद्रासाठी झाला त्याचप्रमाणे लोकायुक्त कायदा हा राज्यासाठी आहे. लोकपाल कायदा आल्यानंतर एक वर्षाच्या आत राज्याने लोकायुक्त कायदा करायचा. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना ३० जानेवारी २०१९ रोजी मी सात दिवस उपोषण केले होत. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही ताबडतोब मसुदा समिती तयार करून समितीच्या मदतीने कायद्याचे काम पूर्ण करून मसुदा विधानसभेत ठेऊ, असे लेखी आश्वासन दिले होते.

फडणवीस सरकारच्या काळात काही बैठका झाल्या. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना मी सांगितले की लोकायुक्तसाठी मसुदा समिती तयार आहे. त्या कायद्याच्या संदर्भाने काही बैठका देखील झाल्या आहेत. कमिटीच्या माध्यमातून तो कायदा पूर्ण करा. ठाकरे सरकारने देखील लेखी आश्वासन दिलं की आम्ही हा कायदा करू. मात्र लोकायुक्तचा मसुदा पूर्ण करायला तयार नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अनेक पत्र लिहिली मात्र ते टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे आता उपोषणाशिवाय मार्ग नाही, असा इशारा राज्य सरकारला हजारे यांनी यावेळी दिला.


लोकायुक्त हा लोकपालच्या धर्तीवर निवड समितीने निवड केल्यानंतर तो कायदा तयार होऊन लोकायुक्तचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी या सर्वांवर नियंत्रण राहणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारला हा कायदा नको आहे असे हजारे म्हणाले.



केंद्राची पण उदासीनता

केंद्रात लोकपालचे कार्यालय सुरू झाले आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकारकडून देखील लोकपाल कायद्याची अपेक्षेप्रमाणे अंमलबजावणी सुरू नाही. लोकपालसाठी कार्यालय सुरू केलं मात्र ते पंचतारांकित हॉटेलमध्ये गरीब माणूस कसा जाणार
तिथे. मोदी सरकारमध्ये देखील इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे.आता फक्त लोकं जागी झाली पाहिजेत. सरकारकडून त्या कायद्यासंदर्भात लोकशिक्षण, लोकजागृती होत नाही, अशी खंतही हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli politics news : 'जयंतराव, विश्वजित कदमांनी विशाल पाटलांचे काँग्रेसचे ‘तिकीट’ कापले', पडळकरांच्या गौप्यस्फोटाने सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

IPL 2026: दिल्लीसमोर पंजाबला रोखण्याचे आव्हान; श्रेयस अय्यरची अपराजित सेना सहाव्या विजयाच्या मार्गावर,पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

ACB Trap Nagpur Corruption Case : नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयातला मोठा मासा जाळ्यात! 5 लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडलं

अटकेच्या दिवशीच खरातची जमीन खरेदी, पत्नी फरार असताना तिच्या नावे व्यवहार पूर्ण; महसूल विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT