Appointment of officers as administrators in 88 gram panchayats of Parner taluka 
अहिल्यानगर

पारनेर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून लागणार अधिकाऱ्यांची वर्णी

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीची मुदती सप्टेंबर अखेर संपत असून त्या ग्रामपंचयतीवर मुदत संपण्याच्या तारखेला प्रशासकाची नेमणुक होणार आहे. मात्र त्या जागेवर प्रशासक सरकारी अधिकारी की ग्रामस्थ हाच खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सध्या हा प्रशन न्यायालयात असल्याने किमान या महिना अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीवर मात्र सरकारी अधिकाऱ्यांचीच वर्णी लागणार आहे.
पारनेर तालुक्यात 113 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी अतीशय मोठ्या संखेने ग्रामपंचायतींच्या मुदती सप्टेंबरअखेर संपत असल्याने त्या ठिकाणी प्रशासकांच्या नेमणुका होणार आहेत. तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या मुदती सप्टेंबरअखेर संपत आहेत.

राज्य निवडणुक आयोग व न्यायालयानेही सध्याच्या सरपंचांना मुदत वाढ देण्यास नकार दिल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. मात्र त्यातच प्रशासक कोण नेमावा हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या दरम्यान सरकारने एक अध्यादेश काढून पालक मंत्र्यांच्या सल्याने मुख्यकार्यकारी आधिकारी यांच्या सहीने प्रशासक नेमावा असा आदेश राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आला होता. त्यावर वेगवेगळ्या स्तरावरून टिकाही झाली होती. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते न्यायालयातही गेले आहेत. या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजीही व्यक्त केली होती इतकेच नव्हे तर त्यासाठी मला कदाचित शेवटचे आंदोलन कारवे लागेल असा इशाराही दिला होता. 

प्रशासक नेमण्याबाबतचा प्रश्नाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू असल्याने पुर्वीच्या नियमानुसार व या महिना अखेरीस तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या मुदती संपत असल्याने व तो पर्यंत न्यायालयाचा निकाल लागण्याची शक्यता नसल्याने तेथे किमान सरकारी अधिकारी यांचीच नेमणुक करावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. 

तालुक्यातील 88 पैकी डिस्कळ, पोखरी, सारोळा आडवाई ,वारणवाडी, कर्जुले हर्या, कासारे, देसवडे व म्हसोबा झाप या आठ ग्रामपंचातीची मुदत 24 ते 28 ऑगस्ट अखेर संपत आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतीच्या मुदती सप्टेंबर अखेर संपत आहेत. त्यामुळे या महिणा अखेर मुदत संपणा-या आठ ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी सरकारी अधिका-यांचीच नेमणुक होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्या मुळे ग्रामस्थांचे तसेच तालुक्यातील राजकिय कार्यकर्त्यांचे याकडे लक्ष लागले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT