Century of Corona in town 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाचे शतक !

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात नगर, राहुरी, पारनेर, राहाता, अकोले येथील व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा आता 100 वर पोचला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत रोजच भर पडत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडत आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 54 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात पाच व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यात घाटकोपर येथून टाकळीमियॉं (राहुरी) येथे आलेली 35 वर्षीय महिला, भिवंडी येथून (नगर) शहरातील दातरंगे मळा येथे आलेला 60 वर्षीय व्यक्ती, ठाणे येथून (पारनेर) येथील हिवरे कोरडे येथे आलेला 46 वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून पिंपळगाव (अकोले) येथे आलेली 66 वर्षीय महिला आणि (राहाता) येथील शिर्डी जवळील निमगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. 


परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून सार्वजनिक संपर्क टाळणे गरजेचे आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, सर्दी, खोकला आदी आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT