Defective seeds .. Only Mahabeej is responsible 
अहिल्यानगर

सदोष बियाणे.. फक्त महाबीजलाच धरले जबाबदार, बाकीच्या कंपन्यांना मोकळे रान

शांताराम काळे

अकोले: सदोष सोयाबीन बियाणे बदलून देण्याच्या सूचना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी महाबीजला दिल्या आहेत. राज्याचे अवर सचिव उमेश चांदवडे यांनी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून या सूचना दिल्या आहेत.

दक्षता समित्यांच्या निर्णयांची वाट न पाहता महाबीजच्या स्तरावर तक्रारीची खातरजमा करून बियाणे बदलून देण्याची कारवाई करावी, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, सदोष बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत व दोषींवर कारवाईबाबत सरकारकडून मौन बाळगण्यात आले आहे.

सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कष्ट व मजुरी यावरील संपूर्ण खर्च वाया गेला आहे. शिवाय ओल व वापशाची वेळ हातातून निघून गेल्याने दुबार पेरणीत पुन्हा पीक उगवेल किंवा नाही हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

शेतकऱ्यांच्या या नुकसानीला सदोष बियाणे पुरविणाऱ्या कंपन्या व सरकारचा बियाणे गुणवत्तेवर नजर ठेवणारा विभाग जबाबदार आहे. आपली जबाबदारी स्वीकारून सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. सरकार मात्र आपली ही जबाबदारी झटकून टाकू पहात आहे.

पत्रामध्ये केवळ महाबीजच्या बियाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. महाबीज व्यतिरिक्त अनेक इतर कंपन्यांनी शेतकऱ्यांना सदोष बियाणे पुरविले. या कंपन्यांना सरकारी यंत्रणेनेच हे बियाणे पुरविण्याची परवानगी दिली आहे. असे असताना केवळ महाबीजलाच पत्र पाठवून इतर बाकी कंपन्यांना मोकळे सोडले जात आहे. सरकारच्या कृषी विभागाने याबाबतही तातडीने खुलासा करण्याची आवश्यकता आहे. 

सदोष बियाणे प्रश्नी दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मोफत बियाणे उपलब्ध करून देत असतानाच, सदोष बियाणे पुरविणारांवर व असे सदोष बियाणे पुरविले जाणार नाही, याची जबाबदारी असणाऱ्या सरकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, शेतकऱ्यांना मशागत, पेरणी, निविष्ठा व मजुरी खर्चासह संपूर्ण खर्च विचारात घेऊन नुकसान भरपाई द्या व भावी काळात असे प्रकार होऊ नयेत यासाठी कठोर उपाय योजना करा अशी मागणी किसान सभा करत आहे.

मागण्यांकडे दुर्लक्ष करत केवळ महाबीजचे बियाणे बदलून देण्यावर शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा किसान सभेने दिला आहे. डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ अजित नवले यांच्या त्यावर सह्या आहेत.

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची संक्रांत होणार गोड! ४ दिवसात जमा होणार ३ हजार... अधिकृत घोषणा!

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला

Vashi Crime : ‘तुझाही संतोष देशमुख करू’ म्हणत सरपंचाला मारहाण; पवनचक्कीच्या कामावरून घडली घटना

Sagittarius Horoscope 2026 : विवाहाचे योग जुळणार? गुरू-शनीच्या कृपेने धनु राशीच्या व्यक्तींचे नवीन वर्ष ठरणार खास!

Akola News: अकोल्याचे जवान वैभव लहाने यांना वीरमरण; वीर जवानाच्या स्मृतीस जिल्ह्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण!

SCROLL FOR NEXT