wedding esakal
अहिल्यानगर

शुभमंगल सावधान‍! लग्नाच्या बाजारात दिखाऊ माल, फसवा धंदा

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : लग्न (wedding) म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबांचे मिलन, हे वास्तव सध्याच्या काळात बदलत आहे. लग्न जमवताना वधू-वर सूचक मंडळांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बाजार मांडला जात आहे. श्रीगोंदे तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यांत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. गोड आवाजातील मुलींचे फोन व सुंदर दिसणाऱ्या मुलींचा बायोडेटा पाठवून हा भूलभुलैयाचा खेळ खेळला जात आहे. मुला-मुलींची लग्ने जमविताना बापाची मोठी दमछाक होते. त्याचाच गैरफायदा काही लोक, संस्था घेत आहेत. राज्यातील विविध भागांत फ्रॉड विवाह संस्था असून, वधू व वरपित्याची आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत.

अशी होते फसवणूक...

मुलगा अथवा मुलीच्या लग्नाचे परिचयपत्र देत ऑनलाइन नोंदणी केली, की विविध फेक वधू-वर सूचक मंडळांकडून फोन येतात. समोरच्याकडून फेक बायोडेटा पाठविला जातो. त्यातील मुलगा अथवा मुलीचे छायाचित्र अर्थातच सुंदर असते. त्यातील मोबाईल क्रमांक व स्थळ लपविले जाते. छायाचित्रावरून पसंती असेल, तर संबंधित संस्थेची नोंदणी फी जमा केल्यावर पूर्ण बायोडेटा मिळेल, असे सांगितले जाते. या संस्थांची फी दीड हजारांपासून दहा हजारांपर्यंत आहे. फी जमा केल्यावर, दाखविलेल्या स्थळाचे जमले असून, दुसरी चांगली स्थळे दाखविण्याच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीची दमछाक केली जाते. सुरवातीला महिन्याला पंचवीस बायोडेटा पाठविण्याचे आश्वासन दिलेले असते, मात्र इतर ठिकाणांहून जमा केलेले काही बायोडेटा पाठवून नंतर, स्थळे आल्यावर पाठवतो, असे सांगून बोळवण केली जाते.

पैसे कमावण्याचा फंडा...

काही सदस्य एकत्र येऊन सोशल मीडियात वेगवेगळ्या संस्थांचे ग्रुप तयार करतात. तीच स्थळे; मात्र फी वेगवेगळी घेतली जाते. अनेकांनी यासाठी धंदाच मांडला आहे. बहुतेक ठिकाणी मुलींना फोन व पाठपुरावा करण्यासाठी कामावर ठेवले जाते. श्रीगोंदे तालुक्यात काही लोक पैसे जमा करून नंतर संबंधित लोकांचे फोन घेत नसल्याची उदाहरणे घडली आहेत. अनेक जण वर-वधू सूचक केंद्र अथवा संस्था स्थापन न करता ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत वावरतात. ‘मी लग्न जमवून देतो; फी द्या,’ असे थेट आमंत्रण मिळते.

माहीतगार लोक व संस्थांचेच फोन घ्यावेत. मोबाईलवर गोड बोलणाऱ्या मुलींपासून दूर राहावे. मुलीचे लग्न जमविताना २२ अथवा २३व्या वर्षीच स्थळे पाहण्यास सुरवात केली तर अडचणी कमी होतील. पैसे घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहिले, तर समस्या येणार नाहीत. रंग, पगार, जमीन या गोष्टींना पित्यांनी प्राधान्य देण्यापेक्षा, मुले व्यसनाधीन नाहीत ना, याला महत्त्व दिल्यास अशी दलालगिरी बंद होईल.

- डॉ. उषा मोरे, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

Godavari gold search: पैठणमधील गोदावरीच्या पाण्यात सोन्या-चांदीचा शोध सुरू! चाळण्या-टोपल्या घेऊन शेकडो नागरिकांची गर्दी, व्हिडिओ पाहा

Road Accident Kolhapur: कोल्हापुरातील हातकणंगले–कुंभोज मार्गावर दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

Nagpur Crime: सख्ख्या भावाचे अत्याचार, १२ वर्षीय बहीण गर्भवती; मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून कृत्य

Malegaon Crime : मालेगाव पुन्हा हादरलं! 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत नराधम अरिब अहमदचं संतापजनक कृत्य; संतापलेल्या नागरिकांनी भरचौकातच...

SCROLL FOR NEXT