wedding
wedding esakal
अहमदनगर

शुभमंगल सावधान‍! लग्नाच्या बाजारात दिखाऊ माल, फसवा धंदा

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : लग्न (wedding) म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबांचे मिलन, हे वास्तव सध्याच्या काळात बदलत आहे. लग्न जमवताना वधू-वर सूचक मंडळांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बाजार मांडला जात आहे. श्रीगोंदे तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यांत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. गोड आवाजातील मुलींचे फोन व सुंदर दिसणाऱ्या मुलींचा बायोडेटा पाठवून हा भूलभुलैयाचा खेळ खेळला जात आहे. मुला-मुलींची लग्ने जमविताना बापाची मोठी दमछाक होते. त्याचाच गैरफायदा काही लोक, संस्था घेत आहेत. राज्यातील विविध भागांत फ्रॉड विवाह संस्था असून, वधू व वरपित्याची आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत.

अशी होते फसवणूक...

मुलगा अथवा मुलीच्या लग्नाचे परिचयपत्र देत ऑनलाइन नोंदणी केली, की विविध फेक वधू-वर सूचक मंडळांकडून फोन येतात. समोरच्याकडून फेक बायोडेटा पाठविला जातो. त्यातील मुलगा अथवा मुलीचे छायाचित्र अर्थातच सुंदर असते. त्यातील मोबाईल क्रमांक व स्थळ लपविले जाते. छायाचित्रावरून पसंती असेल, तर संबंधित संस्थेची नोंदणी फी जमा केल्यावर पूर्ण बायोडेटा मिळेल, असे सांगितले जाते. या संस्थांची फी दीड हजारांपासून दहा हजारांपर्यंत आहे. फी जमा केल्यावर, दाखविलेल्या स्थळाचे जमले असून, दुसरी चांगली स्थळे दाखविण्याच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीची दमछाक केली जाते. सुरवातीला महिन्याला पंचवीस बायोडेटा पाठविण्याचे आश्वासन दिलेले असते, मात्र इतर ठिकाणांहून जमा केलेले काही बायोडेटा पाठवून नंतर, स्थळे आल्यावर पाठवतो, असे सांगून बोळवण केली जाते.

पैसे कमावण्याचा फंडा...

काही सदस्य एकत्र येऊन सोशल मीडियात वेगवेगळ्या संस्थांचे ग्रुप तयार करतात. तीच स्थळे; मात्र फी वेगवेगळी घेतली जाते. अनेकांनी यासाठी धंदाच मांडला आहे. बहुतेक ठिकाणी मुलींना फोन व पाठपुरावा करण्यासाठी कामावर ठेवले जाते. श्रीगोंदे तालुक्यात काही लोक पैसे जमा करून नंतर संबंधित लोकांचे फोन घेत नसल्याची उदाहरणे घडली आहेत. अनेक जण वर-वधू सूचक केंद्र अथवा संस्था स्थापन न करता ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत वावरतात. ‘मी लग्न जमवून देतो; फी द्या,’ असे थेट आमंत्रण मिळते.

माहीतगार लोक व संस्थांचेच फोन घ्यावेत. मोबाईलवर गोड बोलणाऱ्या मुलींपासून दूर राहावे. मुलीचे लग्न जमविताना २२ अथवा २३व्या वर्षीच स्थळे पाहण्यास सुरवात केली तर अडचणी कमी होतील. पैसे घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहिले, तर समस्या येणार नाहीत. रंग, पगार, जमीन या गोष्टींना पित्यांनी प्राधान्य देण्यापेक्षा, मुले व्यसनाधीन नाहीत ना, याला महत्त्व दिल्यास अशी दलालगिरी बंद होईल.

- डॉ. उषा मोरे, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT