The harvested cane was burnt due to short circuit 
अहिल्यानगर

तोडणीला आलेला ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक, महावितरण आमचा काय संबंध

विलास कुलकर्णी

राहुरी : येवले आखाडा येथे आज (शनिवारी) दुपारी साडेबारा वाजता ऊस पिकाला अचानक आग लागली.  दोन एकर क्षेत्रापैकी सव्वा एकर ऊस जळून खाक झाला.  पन्नास-साठ तरुणांनी दीड तास प्रयत्न करून, आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे, आसपासचा दहा एकर ऊसप्लॉट वाचला.

ऊस मालकांनी महावितरणच्या वीजवाहिनी येथील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले. तर; महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी आगीचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले. त्यात, शेतकऱ्याचे एक लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले.

सुरेश जगन्नाथ जाधव (रा. येवले आखाडा) यांच्या दोन एकर आडसाली ऊसाच्या प्लॉटला अचानक आग लागली. राहुरी पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. परंतु, रस्त्यापासून आगीचे ठिकाण लांब असल्याने उपयोग झाला नाही. पन्नास-साठ तरुणांनी जीव धोक्यात घालून उसात शिरले. आगीच्या पुढील बाजूचा ऊस मोडून, आग पसरणार नाही. यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. तरी, दोन एकर पैकी सव्वा एकर ऊस जळून खाक झाला.

उसाच्या प्लॉट वरून महावितरणची ३३ केव्ही व ११ केव्ही क्षमतेची उच्चदाब वीज वाहिनी गेलेली आहे. खालची वीज वाहिनी उसाच्या शेंड्याला टेकत असल्याने, ऊस पेटल्याचे आदेश जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, "ऊसात आगीवर नियंत्रण मिळवितांना माझ्यासह हेमंत जाधव व बाळासाहेब जाधव यांना उसात करंट उतरल्याचे जाणवले. तिघांच्या हाताला मुंग्या येत आहेत. राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी चाललो आहे."

जळीत उसाची पाहणी केली. ऊस वाढलेला आहे. ११ केव्हीची वीज वाहिनी उसाच्या शेंड्याजवळ आहे. परंतु, वीज वाहिनीला उसाचा स्पर्श झाला असता, तर वीजपुरवठा खंडित झाला असता. तसे झाले नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली. असे म्हणता येणार नाही. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

- योगेश गावले, उप अभियंता, महावितरण, राहुरी, अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT