Jamkhed is threatened by the people of Pune and Mumbai 
अहिल्यानगर

कोरोनामुक्त जामखेडला सोयरे, चाकरमान्यांचा धोका

वसंत सानप

जामखेड : जामखेड शहर कोरोनामुक्त झाले खरे; मात्र या पुढील काळात कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान जामखेडकारांसमोर निर्माण झाले आहे. ते मुंबई -पुणेवरून येणाऱ्या तालुक्यातील चाकरमान्यांमुळे दररोजचा येणारा ओघ पाहून हे संकट अधिक 'गडद' होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण वाढू लागले आहे.

या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड येथेच क्वारंटाईन करण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अन्यथा ग्रामीण भागात याचा फैलाव झाल्यास तो रोखणे मोठे अवघड होईल ; अशी स्थिती आहे . 
या संदर्भात अधिक माहिती अशी जामखेड शहरांमध्ये 17 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
 तर 16 जण कोरोना मुक्त झाले. यामध्ये तब्बल दोन महिन्याचा कालावधी जामखेडकरांचा 'हॉटस्पॉट' मध्ये गेला . त्यामुळे त्रस्त झालेले जामखेडकर कोरोनामुक्त होण्यासाठी एकजुटीने लढले.  

प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम केले. त्यामुळे जनता व प्रशासनाच्या एकजुटीचा हा विजय ठरला आहे. मात्र, जामखेड कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त राज्यभरात सर्वदूर पसरले. तालुक्यातून व्यवसायानिमित्त व नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेले चाकरमाने पुन्हा जामखेडकडे आकर्षित झाले आहेत. त्या ठिकाणी वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या चाकरमान्यांनी गड्या रे आपला गाव बरा ; असे म्हणत गावची वाट धरली. परवानग्या घेऊन ही मंडळी गावावर येत असली तरी त्यांना 14 दिवस त्यांच्या गावी क्वारंटाईन करण्याच्या प्रशासनाने ग्रामसुरक्षा समितीला सूचना केल्या आहेत.

ग्रामीण भागांमध्ये सुविधांचा असलेला अभाव नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी अडसर ठरतो आहे. हे लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या बरोबरच खास मुंबई पुण्यावरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाईन करण्याकरिता जामखेड शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालय यांचा आधार घेऊन त्यांना कोरोंटाईन करावे, त्यांच्यावर  नियंत्रणासाठी विशेष अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त करावी आणि चौदा दिवसानंतर त्यांना आपल्या मूळ गावाची वाट दाखवावी, असे केल्यास या मुंबई-पुण्यावरून येणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नाही.

या संदर्भात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात  निर्णयाला दुजोरा दिला आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांच्या मते ग्रामीण भागामध्ये पुरेशा सुविधा या नागरिकांना देता येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT