नगर : ""डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास वेळोवेळी शेतकरीहिताचा विचार करून अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेने कर्जापोटी अटी शिथिल केल्या. मात्र, अद्याप कारखान्याने कराराप्रमाणे 41 कोटी 32 लाख 10 हजार रुपयांचा भरणा केलेला नाही. त्यामुळे कर्जात आणखी वाढ झाली असून, कर्जाच्या थकाबाकीपोटी आता कारखान्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे,'' अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पत्रकाद्वारे दिली.
हेही वाचा ः मुंबईहून आले अन् पाेलिसांच्या दारात गेले
सन 2012-13 मध्ये तनपुरे कारखान्याकडील कर्जाची थकबाकी वाढल्याने खाते एनपीएमध्ये गेले होते. बॅंकेने थकबाकीचा वारंवार तगादा लावूनही कारखान्याने भरणा केला नाही. बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कारखान्यास नोटीस दिली. तथापि कारखान्याने रकमेचा भरणा न केल्याने कारखाना जप्त करून बॅंकेच्या ताब्यात घेतला. त्यानंतर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याच्या ऊसगाळपाची गैरसोय होऊ नये, म्हणून बॅंकेने थकबाकीसह एकूण 90 कोटी दोन लाख 82 हजार कर्ज रक्कम विचारात घेऊन कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, कारखान्याकडून अद्याप अटींची पूर्तता झाली नाही. त्यामुळे तनपुरे कारखान्यावर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.