The life of Chhatrapati Shivaji teaches a lot
The life of Chhatrapati Shivaji teaches a lot 
अहमदनगर

छत्रपती शिवरायांचे जीवन खूप काही शिकवते, अण्णांनी सांगितली ध्येयाची गोष्ट

एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी : छत्रपती शिवाजी महाराजांनी युवा अवस्थेत ध्येय ठरवून स्वराज्य निर्माण केले. जीवनाचे ध्येय ठरले तर किती काम करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

राळेगणसिद्धी येथे आयोजित शिवजयंती उत्सवात हजारे बोलत होते. हजारे म्हणाले, की शिवरायांचा इतिहास हा नेहमीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. चंद्र, सूर्य, तारे जोपर्यंत आहे. तोपर्यंत हा इतिहास राहणारच आहे. शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत आणण्यासाठी गेलेल्या सर्व मावळ्यांचे हजारे व माजी सरपंच जयसिंग मापारी यांनी कौतुक केले. सुशांत पठारे याने भाषणातून शिवरायांचा इतिहास सर्वांच्या समोर उभा केला.

माजी उपसरपंच लाभेष औटी, शरद मापारी, अभिषेक नवले, स्वप्निल मापारी, अक्षय जाधव, राजाराम फटांगडे, रंगनाथ पोटे, आकाश औटी, विकास पठारे, मनोज औटी, प्रविण फटांगडे, संकेत मापारी, भुषण गाजरे, हिरामण जाधव, अक्षय पठारे, बाबाजी साळुंके, हनुमंत पठारे, विशाल गोधडे, अमोल मापारी, सुशांत पठारे, दादाराम पठारे, सुनील पठारे, ज्ञानेश्वर भालेकर आदींनी शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी व यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. अरुण भालेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

ध्येयाच्या दिशेने चालायला लागल्यावर अनेक अडचणी येतात. मात्र, ध्येयवादी व्यक्ती डगमगत नाहीत. घाबरत नाही, माघारही घेत नाही. तो आपल्या ध्येयाच्या दिशेने चालतच राहतो आणि इतिहास घडवितो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्तम व मूर्तिमंत उदाहरण आहेत.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT