MLA Sangram Jagtap adopted the signal 
अहिल्यानगर

याला म्हणतात आमदार, त्यांनी काय दत्तक घेतलं बघा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः आमदार संग्राम जगताप यांची नगर शहरात मोठी क्रेझ आहे. ते तरूणांच्या गळ्यातील ताईत आहेत. मितभाषी स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच लोकसंग्रह केला. त्यांचा कामाची स्टाईल एकदम हटके आहे.

 जिल्हा वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यांत दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे दीड कोटींचा महसूल जमा केल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. या निधीतून महापालिकेला सिग्नल जीर्णोद्धार निधी देण्याची मागणी जागरुक मंचाने केली.

त्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले. अखेर या वृत्ताची दखल घेत, आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील आठ सिग्नल दत्तक घेतले आहेत. तसे पत्र जागरुक मंचाला दिले आहे. 

शहरात वर्षांनुवर्षे बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी जागरुक नागरिक मंचाने गृहमंत्रालयाकडे केली होती. निवेदनात म्हटले होते, की जिल्हा वाहतूक शाखेने अवघ्या आठ महिन्यांत सुमारे दीड कोटींचा दंड वसूल करून विक्रम नोंदविला.

या महसुलातून कमीत कमी 25 लाख रुपये दारिद्रयरेषेखालील नगरच्या महापालिकेला शहरातील सिग्नल सुरू करण्यासाठी दान म्हणून द्यावेत, अशी मागणी केली. तसे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची व जागरुक नागरिक मंचाच्या मागणीची दखल घेत, आमदार जगताप यांनी शहरातील आठ सिग्नल दत्तक घेतले आहेत. 

कायनेटिक चौक ते प्रेमदान चौक दरम्यानच्या राज्य महामार्गावरील आठ सिग्नलची देखभाल-दुरुस्ती जगताप स्वखर्चातून करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसे पत्र जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांना देण्यात आले आहे. 


नगरकरांना नियमांची ऍलर्जी असून, सर्व सिग्नल सुरू झाल्यानंतर त्यांना थोडीफार शिस्त लागेपर्यंत वाहतूक शाखेने प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे. 
- सुहास मुळे, अध्यक्ष, जागरुक नागरिक मंच , अहमदनगर.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: भात आणि ऊस कापणीच्या काळात कोल्हापुरात ४० जणांचा सर्पदंशाने मृत्यू.

Latest Marathi News Live Update : परळीत मुंडे समर्थकांचे आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Yoga for Diabetes and Hernia: फक्त पचनासाठी नाही तर मधुमेह अन् हार्नियावरही प्रभावी ठरते 'हलासन'; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

मनसेसोबत युती करणार का? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला, मविआच्या नेत्यांना दिला सल्ला

Kolhapur Guns License : कोल्हापूर जिल्ह्यातील परवानाधारक पाच हजार बंदुका जमा करण्याचे आदेश, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT