In more than four lakh tonnes of onions 
अहिल्यानगर

कांदा पडून... शेतकऱ्यांचा डोक्‍याला हात... 

मार्तंड बुचुडे

पारनेर ः कांद्याला गेल्या वर्षी मिळालेल्या वारेमाप बाजारभावामुळे, या वर्षी तालुक्‍यातील 22 हजार 235 हेक्‍टरवर कांदालागवड झाली होती. किमान साडेपाच लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन झाले. मात्र, लॉकडाउन आणि बाजारभावाअभावी बहुतेक शेतकऱ्यांनी किमान चार लाख टनांहून अधिक कांदा साठविला आहे. या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने "नाफेड'मार्फत किमान 20 रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

पारनेर बाजार समितीत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याला 15 हजार रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. परिणामी, यंदा सुमारे 22 हजार 235 हेक्‍टरवर कांदालागवड झाली. सुमारे साडेपाच लाख टन उत्पादन झाले. उत्पादन वाढल्याने, तसेच देशात व राज्यातही लॉकडाउनमुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने, अवघा पाच ते सहा रुपये किलो, म्हणजे पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठविला. भविष्यात चांगला भाव मिळाला नाही तर मात्र शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. कांदालागवडीचा खर्च हेक्‍टरी सुमारे 70 हजार रुपयांच्या आसपास येतो. त्यामुळे किमान 20 रुपये किलो दराने सरकारने "नाफेड'मार्फत कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

किलोमागे पाच रुपये अनुदान द्यावे ः गायकवाड 
पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले, की सरकारने शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांना नऊ रुपये किलो दराने कांदाखरेदीची परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांनी तो तेथे स्वतः ग्रेडिंग करून पाठवायचा आहे. मात्र, बाजार समित्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. अडीच महिने बाजार समितीमधील कांदाखरेदी बंद आहे. कांद्यासाठी प्रामुख्याने दक्षिण भारत व हॉटेल व्यावसायिकांची मोठी मागणी असते. ही मागणी सध्या नाहीच. निर्यातीलाही कोरोना संकटामुळे अडचणी आहेत. त्यामुळे भाव कमी झाले. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना किलोमागे पाच रुपये अनुदान द्यावे किंवा 20 रुपये दराने "नाफेड'मार्फत कांदा खरेदी करावा. 


सध्या कांद्याला बाजारभाव कमी आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावा. भविष्यात नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये चांगला बाजारभाव मिळण्याची शक्‍यता आहे. कांदाविक्रीची घाई करू नये, कारण साठविलेला अनेकांचा कांदाही पावसाने भिजल्याने फार दिवस टिकणार नाही. 
- रामदास दरेकर, तालुका कृषी अधिकारी  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT