New experiments in agriculture by youth from Mumbai and Pune 
अहिल्यानगर

तरुणाई पोलिस भरतीच्या प्रतिक्षेत; मुंबई, पुण्यातून आलेले तरुणांचे शेतीत नवनवीन प्रयोग

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : ग्रामीण भागातुन कामानिमित्त पुणे- मुंबई सारख्या महानगरात गेलेली तरुणाई कोरोनाच्या धास्तीने गावाकडे रमली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण गावाकडे राहुन शेतीक्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवित आहे.

शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांची लुट होत असल्याने शेतीकामातुन वेळ काढुन पोलिस भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुणाई मैदानी सराव करीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लवकरच पोलिस भरती घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

सरकार स्थापनेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. आणि राज्याच्या गृह खात्याचे सुत्र मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आले. निवडणुकीनंतर राज्य कारभार रुळावर येताना चीनमध्ये सुरु झालेला कोरोनाचा संर्सग राज्यासह देशभरात पसरला. पाच महिन्यापासुन प्रशासन आणि नागरीक कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक अडचणीचा सामोरे जावे लागले. 

कोरोनाने सामान्यांचे जीवन बदलले आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले तर काहींची उपासमारीची झाली. राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगार तरुण पोलिस भरती प्रक्रियेसह सरकारी व खासगी नोकरीच्या शोधात आहे. कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट आणखी वाढले आहे. ग्रामीण भागातील तरुणाई सध्या पहाटे व सायंकाळी रस्त्याच्याकडेला धावण्याचा सराव करीत आहे.

सरकारच्या माहितीनुसार पोलिस भरती लवकरच होणार असल्याने शेकडो तरुणांनी मैदानी सरावाकडे लक्ष दिले आहे. भर्ती निघाल्यानंतर महिनाभरात मैदानी चाचणी घेतली जाते. मैदानी सरावासाठी सातत्य आणि मोठा कालावधी लागतो. त्यामुळे भरती लवकरच निघेल अशी आशा ठेवुन शेकडो तरुण सध्या मैदानी सरावासाठी रस्त्याच्याकडेला धावत आहे. ग्रामीण भागात शेतीसह शेतीपुरक व्यवसाय केले जातात.

नगर जिल्यात दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गायीचे पालन करुन दुध व्यवसायातुन कुटूंबाला आर्थिक आधार मिळतो. गायीना चारा-वैरण करुन शेतीकामातुन मिळालेल्या वेळेत तरुण लेखीचा सराव करतात. दिवसभर शेतीकामे आणि रात्री स्वयं-अध्ययनासह पहाटे व सायंकाळी मैदानी सरावा असा दिनक्रम ग्रामीण भागातील तरुणाईचा आहेत.

मातुलठाण येथील जगदीश बोर्डे म्हणाले, शेतीकामे करुन मिळालेल्या वेळेत पोलिस भरतीची तयारी करीत आहोत. कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट आणखी वाढले आहे. शेतीसह दुधव्यवसाय फारसा परवड नसल्याने शेती करण्यापेक्षा चांगली नोकरी शोधत आहे. सरकारने तातडीने मोठी पोलिस भरती काढावी. त्यासाठी शेकडो तरुण नियमित मैदानी सरावासह लेखीची तयारी करीत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT