अहिल्यानगर

Sambhaji Nagar : आरटीईच्या यंदाही सहाशे जागा रिक्तच

मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - आरटीई प्रवेश प्रक्रियेतील सर्व फेऱ्यांची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाली आहे. परंतु, तरी देखील क्षमतेच्या ४ हजार ६२ पैकी ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. विलंबाने होत असलेल्या प्रक्रियेचा हा परिणाम असल्याचे पालकांनी म्हटले आहे; तर ठराविक शाळांमध्येच पालकांचा प्रवेश हट्ट असल्यानेच जागा रिक्त राहिल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीची प्रक्रिया जानेवारीत सुरू करण्यात आली. तर त्याचा प्रवेशाचा ड्रॉ हा मार्चमध्ये काढण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५४५ शाळा यंदा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या असून, त्यांची प्रवेश क्षमता ४ हजार ६२ आहे. त्यापैकी ३ हजार ४५३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. नियमित चार फेऱ्या आणि चार विशेष फेऱ्यानंतरही ६०६ जागा या रिक्त राहिल्या आहेत.

दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत ठराविक शाळांकडे पालकांचा कल अधिक असतो. अशा काही नामांकित शाळांकडून प्रवेशासाठी पालकांची अडवणूक केली जाते. त्याअनुषंगाने यंदा खबरदारी म्हणून शाळांनी प्रवेशासाठी आडमुठेपणा केल्यास कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला होता.

त्यामुळे प्रवेश प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. तर विद्यार्थ्याचे प्रतिक्षा यादीत नाव असताना प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने नाईलाजास्तव पालकांनी इतर शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेतल्याचे पालकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT