Such a positive result in the Corona crisis
Such a positive result in the Corona crisis 
अहमदनगर

कोरोनाचा असाही सकारात्मक परिणाम.. पण "यांना' बसलाय दणका

सतीश वैजापूरकर

शिर्डी : कोरोनाच्या भीतीने लोक अधिक दक्षता घेऊ लागल्याने त्यांचे आरोग्य सुधारले. मात्र, त्यामुळे औषध कंपन्यांचे अर्थकारण पुरते बिघडले आहे. सर्दी, कावीळ, टायफाईड असे या दिवसांत हमखास होणारे आजार लुप्त झाले. त्यावरील औषधांच्या विक्रीत तब्बल 70 टक्के घट झाली. 

कावीळ आणि टायफाईड आजारांच्या चाचण्या जवळपास बंद झाल्या. कोरोनाच्या कृपेने डॉक्‍टरांच्या दृष्टीने मंदीचा, तर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुगीचा काळ आला. एरवी जिल्ह्यात दरमहा 6 कोटी रुपये किंमतीची औषधे विकली जातात. आता ही विक्री दोन कोटींपर्यंत खाली आली आहे. त्यातही या आजाराव्यतिरिक्त असलेल्या औषधांचा समावेश आहे. हे पहिल्यांदाच घडते आहे. 

औषधांच्या खपात 70 टक्के घट

कोरोना संसर्गाच्या भीतीने लोक घरात थांबतात. बाहेर जाताना मास्क लावतात. वारंवार हात स्वच्छ करतात, बाहेर खाणे टाळतात. त्याचा परिणाम म्हणून पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसात वातावरण बदलामुळे हमखास होणारी सर्दी, कावीळ, टाईफाईड या आजारांत लक्षणीय घट झाली. त्यामुळे त्यावरील औषधांच्या खपात तब्बल 70 टक्के घट झाली आहे. त्यातही विक्री होणाऱ्या औषधांत हृदयविकार, मधुमेह, संधीवात यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. औषध कंपन्या विक्री प्रतिनिधीकडे इष्टांकपूर्तीसाठी तगादा लावत असल्या, तरी मागणीच नसल्याने औषधांचा खप वाढेनासा झाला आहे. प्रयोगशाळांत टायफाईड व कावीळसाठी कराव्या लागणाऱ्या रक्तचाचण्याचे प्रमाणही नगण्य झाले. 

दवाखाने ओस पडले 

जिल्ह्यात विविध औषध कंपन्यांचे 300हून अधिक विक्री प्रतिनिधी आहेत. एरवी या काळात त्यांना दरमहा एक ते सव्वा लाख रुपये किंमतीची या आजारांवरील औषधे विकण्याचे उद्दिष्ट दिले जाते. रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने खपाच्या वाढीनुसार विक्री प्रतिनिधींना जादा मोबदला मिळतो. डॉक्‍टरांना औषधविक्रीतून अधिक नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविले जाते. कोरोनामुळे परिस्थिती बदलली. लोकांना हे आजार होत नसल्याने, दवाखानेही ओस पडले. एरवी हिवाळ्यात दिसणाऱ्या दृश्‍य आजारांचा हंगाम समजल्या जाणाऱ्या पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात दिसते आहे. 

मृत्यूदरातही मोठी घट

कोरोनाच्या धास्तीने लोकांचे आरोग्य सुधारले. परिणामी, औषधांच्या खप 70 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे वास्तव आहे. एवढेच नव्हे, तर मृत्यूदरही घटला आहे. कोपरगाव शहरात दरमहा 70 ते 90 मृत्यू होत. ही संख्या सध्या 20 ते 25 पर्यंत कमी झाली आहे. ही कोरोनाचा कृपा आहे. 
- संजय काळे, औषधविक्री प्रतिनिधी व माहिती अधिकार कार्यकर्ते 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT