पाणी sakal
अहिल्यानगर

तीन महिन्यापासून गाव पाण्यापासून वंचित

तीन किलोमीटर वरून आणावे लागते महिलांना पाणी

​शांताराम काळे

अकोले : तालुक्यातील माणिक ओझर येथील नळपाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून कार्यान्वित असताना गेली तीन महिन्यापासून ही योजना बंद असल्याने महिलांना तीन किलोमीटर पायी चालत डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.आज महिलांनी याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सौ.हेमलता पिचड यांना लेखी निवेदन देऊन काही करा आम्हाला पाणी द्या अशी विनंती केली.

माणिक ओझर , बलठन, गोंदुशी या तीन गावची ग्रुप ग्रामपंचायत असून या गावात महिला ग्रामसेवक आहे.या गावातील ग्रामस्थ नळ पाणी पट्टी देऊनही त्यांना पावती नाही याबाबत ग्रामसेवक उत्तरे देत नसल्याने ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना तक्रार करूनही यावर उपाय निघाला नाही उलट तीन महिन्यापासून नळ योजना बंद असल्याने महिलांना तीन किलोमीटर वरून पानी आणावे लागत असल्याची माहिती मंदा बाई साबळे यांनी दिली.यावेळी मीराबाई बोटे,झुंबराबाई तळपाडे, सुवर्णा साबळे,रवींद्र बोटे,देवराम साबळे व ५० ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune E-Bus Project: ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच एक हजार ‘इ बस’; राज्य सरकारकडून अखेर हमी, पाच महिन्यांत दाखल होणार

IPL 2026 साठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव, रिटेंशनची अंतिम तारीख काय? समोर आली महत्त्वाची अपडेट्स

Whatsapp ला आलं 'सायबर कवच'! ऑन करताच हॅकर्सना बसणार दणका; Strict Account फीचरने फ्रॉड कॉल्सचा प्रॉब्लेम संपवणार, एकदा वापरुन बघाच

Latest Marathi Breaking News Live: मी कालही चुकीचं केलं नाही, पुढेही करणार नाही - अजित पवार

Flight Mode फक्त विमान प्रवासासाठी नाही! जाणून घ्या फोनसाठी कसे ठरते फायदेशीर?

SCROLL FOR NEXT