Akola News: 15-year-old girls child marriage begins, child helpline team arrives 
अकोला

15 वर्षांच्या मुलीचा सुरू होता बालविवाह, तेवढ्यात पोहचली चाईल्ड हेल्पलाईनची टीम

सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी (ता.३०) रिसोड तालुक्यातील लोणी (बु.) येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची माहिती अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून प्राप्त झाली होती.

त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या समुपदेशनाने सदर बालविवाह रोखला.


बालविवाहाबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे यांच्या समन्वयाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी एम. चौधरी, सामाजिक कार्यकर्ता अनंता पी. इंगळे, अजय जी. यादव, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर पी. वाळले तसेच रिसोड तालुका संरक्षण अधिकारी गोपाल एस. घुगे यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले.

पथकाने रिसोड पोलिस स्टेशनचे गजानन वानखेडे, पोलिस पाटील अंबादास दीक्षे यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले.

जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT