Akola News: Widow Alishan b. Took record production of soybeans 
अकोला

चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन,  विधवा महिला अलिशान बी. ने घेतले  विक्रमी उत्पादन

सकाळ वृत्तसेेवा

महान (जि. अकोला)  : सन २०१२ पासून ते २०२० पर्यंत नऊ वर्षापासून सोयाबीनच्या विक्रमी उत्पादन घेणाऱ्या महान येथील विधवा ज्येष्ठ महिला अलिशान बी. शेख कालू यांनी यावर्षीही विक्रमी पीक घेतले.

अकोला जिल्ह्यातील महान परिसरात त्यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची १० ऑक्टोबर रोजी सोंगणी झाली तर १४ ऑक्टोबर रोजी बियाणे काढणी झाली. त्यांना चार एकरात ५१ क्विंटल म्हणजे एकरी साडेबारा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले.

त्यांना सन २०१२ पासून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होत असल्याने त्यांना सीड्स कंपनी व महाबीज महामंडळाकडून सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे. त्यांना बार्शीटाकळीचे तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, चांदुरकर कृषी सहाय्यक अनिल ढोरे, यशवंत कोहर, खेडकर, गावंडे सह अन्य कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.


‘कही खुशी कही गम’
यावर्षी झालेल्या जास्त प्रमाणात पावसामुळे महान परिसरातील सोयाबीन,तूर, कपाशी पिकांचा धिंगाना झाला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगात कमी प्रमाणात दाणा भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप घट आल्याने महान परिसरातील शेतकऱ्यांनी एकरी तीन क्विंटल पासून ते दहा क्विंटल आत झडती लागत असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना खर्चही काढता आला नसल्याने ‘कही खुशी कही गम’चे चित्र पहावयास मिळत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

फसवून लाटलेली जागा-जमीन मिळते परत! ३ वर्षांच्या आत द्यावी लागते तक्रार; फसलेल्याने वकिलांमार्फत ‘येथे’ करावा अर्ज, ‘या’ ६ बाबी लक्षात ठेवाच...

Phaltan Crime: फलटणमध्‍ये हल्ल्यांचे सत्र सुरूच; दोन व्‍यावसायिकांपाठोपाठ दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनाही जबर मारहाण, काय कारण?

आजचे राशिभविष्य - 25 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT