mrutadeh.jpg
mrutadeh.jpg 
अकोला

अरे देवा...कोरोनाची भीती एवढी की, अंत्यसंस्कारासाठी हातगाडीवरूनच नेला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : कोरोनाच्या भीतीमुळे सामजातील माणुसकी हरवली असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रोज आपण काहीना-काही ऐकत आहो. शुक्रवारी (ता.29) शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने, त्याला खांदा द्यायलाही कोणी तयार नसल्याने अखेर नातेवाईकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.

पत्नीच्या भावाने केले सहकार्य
कोरोनाच्या महामारीने एक धास्ती प्रत्येकाच्या मनात बसली आहे. स्वतःचे नातेवाई सुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नसल्याच्या घटनांमधून बघायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील आठवडी बाजारात राहणारे गजानन भटकर (वय 55) व्यक्तीचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. घरात पत्नी व लहान मुले. त्यात लॉकडाउन मुळे नातेवाईक येऊ शकले नाहीत.

घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची त्यामुळे अंत्यसंस्कार करणे सुद्धा कठीण. त्यात मृतदेहाला खांदा द्यायला कोणी नसल्याने मोठा प्रश्‍न मृतकाच्या पत्नी समोर उभा राहला होता. मृतकाच्या पत्नीचा भाऊ शहरातच राहतो कोणी खांदा द्यायला तयार नसल्याने त्यांनी हातगाडीवर मृतदेह ठेऊन स्मशानभूमी गाठली व मृतकावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने माणुसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

युवकाने दिला माणुसकीचा परिचय
शहरातील शिवाजी चौक येथे राहणारा युवक मनीष गवळी याने स्वतःहून पुढाकार घेऊन मृतकाच्या घरच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली. परिस्थिती हलाकीची असल्याचे समजल्याने, त्याने मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च देऊन आपली माणुसकी दाखवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT