Unseasonal rain sakal
अकोला

Akola Rain Update : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी प्रतीक्षाच

मदत जाहीर परंतु १२ हजार शेतकऱ्यांच्या याद्यांचे अपलोडिंग बाकी

सकाळ डिजिटल टीम

Akola Rain Update - जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला व शेवटी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे पालेभाज्यांसह फळ पिकांचे नुकसान झाले. अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून मदतही जाहीर करण्यात आली.

त्यानुसार बाधित २६ हजार ५५७ शेतकऱ्यांपैकी अद्याप केवळ १४ हजार ३६१ शेतकऱ्यांच्याच याद्या शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत, तर अद्याप १२ हजार १९६ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होणे बाकी आहे. त्यामुळे मदत जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात ६, ७ मार्च व ९ आणि १५ ते १९ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली होती. त्यामुळे फळबागा व रब्बी हंगामातील गव्हासह अन्य पिकांचे नुकसान झाले हाेते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ७ ते ९ एप्रिल दरम्यान सुद्धा अवकाळी पावसाने झोडपले होते. गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रब्बी हंगामात हाता तोंडाशी येणारा घास पावसाने हिरावला.

फळ बागांना सुद्धा अवकाळीचा मोठा फटका बसला. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरु असतानाच एप्रिल महिन्यात पुन्हा २६ ते ३० एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यात नुकसान झाले. त्यासोबतच सर्वाधिक नुकसान एकट्‍या पातूर तालुक्यात झाले. या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर मदतीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला.

शासनाने सुद्धा मदत जाहीर केली. परंतु तालुकास्तरावर एप्रिल महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. प्रत्यक्षात २६ हजार ५५७ शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना ६ जुलैपर्यंत केवळ १४ हजार ३६१ शेतकऱ्यांच्याच याद्या अपलोड करण्यात आल्या, तर उर्वरीत १२ हजार १९६ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याद्या अपलोडच न झाल्याने शेतकऱ्यांना अनुदानासाठी सुद्धा प्रतीक्षा करावी लागत आहे.

असे झाले होते नुकसान

जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर तालुक्यातील ९ हजार २६८.६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका १५ हजार ३७१ शेतकऱ्यांना बसला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १६ कोटी ५५ लाख रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती.

२६ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पाच हजार ८८५.६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ११ हजार १८६ शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला होता. संबंधितांसाठी १० कोटी २६ लाख ३३ हजारांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती.

  • अशी आहे सद्यस्थिती (एप्रिल महिन्यातील)

  • एकूण बाधित क्षेत्र - २६ हजार ५५७

  • बाधित शेतकरी - २६ हजार ५५७

  • शासनाकडू मंजूर रक्कम - २६ कोटी ७३ लाख ५९ हजार

  • नावे अपलोड केलेल्यांची संख्या - १४ हजार ३६१

  • अद्याप नावे अपलोडिंग बाकी - १२ हजार १९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT