village became a school walls became fruit First venture in Akola district
village became a school walls became fruit First venture in Akola district sakal
अकोला

गाव झाली शाळा, भिंती झाल्या फळे; अकोला जिल्ह्यात प्रथम उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील आरखेड या गावात ''प्रथम'' एज्युकेशन फाउंडेशन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील भिंती ह्या अक्षर भिंती म्हणून झळकायला लागल्या आहेत.

शिक्षण हे चार भिंतीच्या आतच नसून शिक्षणाची द्वार हे खुल्या वातावरणात उघडे करून चालता बोलताना, खेळताना सुद्धा आपण शिकू शकतो आणि आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करू शकतो हा यामागचा उद्देश आहे.हा उपक्रम सर्वांनाच मुलांच्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे त्यामुळे सर्वं गावकऱ्यांनी यामध्ये हिरिरीने सहभाग नोंदवला.तसेच याच संकल्पनेतुन गावामध्ये ग्राम शिक्षा केंद्र सुद्धा स्थापन करून मुलांना त्यामध्ये स्पर्धा परीक्षा व इतरही विषयावर अभ्यास करण्यासाठी मदत व्हावी असा सर्व गावकऱ्यांचा हेतू आहे. अक्षरभिंती मुळे जणू काही गावातील मुले तसेच वयोवृद्ध सुद्धा या खुल्या शाळेमध्ये शिकत आहे.

या उपक्रमाला सहकार्य हे सर्व गावकऱ्यांचे लाभले. विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे आरखेड ग्रामपंचायत चे सरपंच शेख जमिल शेख खलील, जिल्हा परिषद सदस्या रंजनाताई नरेश विल्लेकर, पंचायत समिती सदस्य दादाराव किर्दक व प्रकाश वानरे, पोलीस पाटील विजय वाकोडे, मुख्याध्यापक विजय डवरे, ग्रामसेविका दीपिका कुटेमाटे, तलाठी भाग्यश्री देशमुख,रोजगार सेवक संजय वाकोडे, माजी सरपंच, विजय लोडम, श्री विनायकराव वाकोडे श्री बाळू वर्घट ,ग्रामपंचायत सदस्य महादेव लोडम, नंदकिशोर वाकोडे ,आशा सेविका मंदा होले,अंगणवाडी सेविका रेखा ठोकळ,व समस्त ग्रामस्थ,प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे जिल्हाप्रमुख श्री सुनील इंगळे सर,सीआरएल अमोल नाईक व वैभव बाजड यांचे मार्गदर्शन ''अक्षर'' भिंती करिता उपयुक्त ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

PM Modi: "बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे"; PM मोदींचा पुन्हा ठाकरेंना साद घालण्याचा प्रयत्न?

Chabahar Port: चीनच्या पाकिस्तानमधील ग्वादार बंदराला भारताचे 'चाबहार'ने प्रत्युत्तर; इराणसोबत ऐतिहासिक करार

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

SCROLL FOR NEXT