capgemini it company recruitment 2020 around 15 thousand campus interviews 
अर्थविश्व

गुड न्यूज : ‘या’आयटी कंपनीत होणार मेगाभरती! 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बेरोजगारी हे सध्या भारतातील सगळ्यांत मोठी समस्या आहे. अनेकांना पदव्या घेऊनही नोकरीच्या संधी नाहीत. आयटी क्षेत्रातही नोकरीच्या संधी हव्या तशा नसल्यामुळं सध्या चिंतेचं वातावरण आहे. त्यातच एका कंपनीनं मेगाभरती करण्याची घोषणा केली आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॅपजेमिनी चालू वर्षात तब्बल 12 ते 15 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अनेक  पदवीधरांची निवड केली होती. पदवीधरांची निवड करताना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान 3.8 लाख रुपयांचे  वेतन देणार आहे. मात्र आयआयटी आणि एनआयटीच्या विद्यार्थ्यांना 6.5 लाख रुपयांपर्यत वार्षिक वेतन दिले जाते. 

अर्थविश्व संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कॅपजेमिनीच्या भारतातील कार्यालयांमध्ये 1.2 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या कंपनीच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या निम्म्याहून अधिक आहे. कंपनी सध्या 5 जी तंत्रज्ञानावर काम करत असून कंपनीने त्यासाठी पॅरीस आणि मुंबईत दोन केंद्र सुरू केली आहेत, अशी माहिती कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी दिली. कॉग्निझंटने देखील चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT