IMF 
अर्थविश्व

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज'; IMFनं वर्तवला अंदाज

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन (अमेरिका) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ १२.५ टक्क्यांनी होईल, असा अंदाज ‘आयएमएफ’ने वर्तविला आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. फक्त चीन या एकमेव मोठ्या अर्थव्यवस्थेची गेल्यावर्षी सकारात्मक वाढ झाली.

‘आयएमएफ’ने आपल्या वार्षिक अहवालात लक्षवेधक अंदाज वर्तविले आहेत. त्यानुसार, २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ६.९ टक्क्यांनी होईल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्था विक्रमी ८ टक्क्यांनी आकुंचित पावली होती. पण यंदा म्हणजे २०२१ मध्ये हीच वाढ आता तब्बल १२.५ टक्क्यांनी होईल, असे म्हटले गेले आहे. अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असताना, भारतासाठी व्यक्त केलेला अंदाज महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये चीनने २.३ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदविली होती. यावर्षी (२०२१) त्यांची वाढ ८.६ टक्के, तर २०२२ मध्ये ५.६ टक्के होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘‘आमच्या आधीच्या भाकितांच्या तुलनेत जागतिक अर्थव्यवस्था अधिक भक्कमपणे सुधारत असल्याचा आमचा आता अंदाज आहे. २०२१ मध्ये ६ टक्के, तर २०२२ मध्ये ४.४ टक्के वाढीचा अंदाज आहे.’’
- गीता गोपीनाथ, ‘आयएमएफ’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT