brexit
brexit 
अर्थविश्व

'ब्रेक्‍झिट'मुळे लंडनचे आर्थिक महत्त्व ओसरेल...

वृत्तसंस्था

बर्लिन - "ब्रेक्‍झिट'मुळे जागतिक आर्थिक सेवांच्या दृष्टिकोनामधून सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या लंडनचे महत्त्व कमी होण्याची शक्‍यता असल्याचा इशारा जर्मनीतील मध्यवर्ती बॅंक असलेल्या "बुंडेसबॅंक'च्या कार्यकारी समितीचे सभासद असलेल्या डॉ. अँद्रिआस डोंब्रेट यांनी दिला आहे.

जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनामधून लंडन हे युरोपचे प्रवेशद्वार समजले जाते. सध्या लंडन हे शहर युरोपिअन युनियनच्या आर्थिक सेवांची राजधानीचे केंद्र आहे. इयुच्या परकीय विनिमयासंदर्भातील सुमारे 80% व्यवहार हे लंडनमधूनच होतात. या पार्श्‍वभूमीवर डोंब्रेट यांनी दिलेला अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

बॅंकिंग क्षेत्रातील नियमांमध्ये समतोल आणला; तरी आता ब्रिटन आणि युरोपिअन युनियनमध्ये समान बाजारपेठ राहणार नाही, असे डोंब्रेट यांनी म्हटले आहे. ब्रेक्‍झिटसंदर्भातील प्रदीर्घ राजनैतिक चर्चेचा प्रवास आता पुढे कसा होईल, यासंदर्भात अद्याप मोठी अनिश्‍चितता असल्याचे डोंब्रेट यांनी यावेळी स्पष्ट केले.


ते म्हणाले -

  • ब्रेक्‍झिटनंतर करसवलत आणि आर्थिक नियमनात शिथिलता आणत ब्रिटन "युरोपचे सिंगापूर' होण्याचा प्रयत्न करेल
  • ब्रेक्‍झिटचा निर्णय हा सध्या पुन:राष्ट्रीयीकरणाच्या असलेल्या वातावरणास साजेसाच
  • मात्र यामुळे आपल्या सर्वांवरच नकारात्मक परिणाम होईल. या पार्श्‍वभूमीवर, आपण सर्वांनीच पुन:राष्ट्रीयीकरणाच्या या मतप्रवाहाचा आणखी प्रसार रोखावयास हवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT