world economy main.jpg 
अर्थविश्व

'जपानला मागे टाकत 2050 पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार'

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- भारतीय अर्थव्यवस्था 2050 पर्यंत चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. मेडिकल जर्नल लँसेटमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था सन 2100 पर्यंत या स्थानावर कायम राहील. 2017 मध्ये भारत जगातल सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. लँसेटने 2017 हे आधार वर्ष मानून म्हटले आहे की, भारत 2030 पर्यंत अमेरिका, चीन, जपाननंतर चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि नंतर 2050 मध्ये जपानलाही मागे टाकेल. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या स्थानावर आहे. भारताच्या मागे फ्रान्स आणि ब्रिटन आहे.

भारत 2047 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले होते. परंतु, कोरोना विषाणूमुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे अंदाज थोड्याप्रमाणात चुकले आहेत. 

कोरोनाच्या संकटापूर्वी जपान सेंटर फॉर इकॉनॉमी रिसर्चने मागील वर्षी डिसेंबरमध्ये केलेल्या एका अभ्यासात म्हटले होते की, भारत 2029 पर्यंत जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2025 मध्ये 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारत सरकारने आपले महत्त्वकांक्षी लक्ष्यही निर्धारित केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT