RBI 
अर्थविश्व

बँकिंग घोटाळ्यांमुळं दररोज होतंय १०० कोटींच नुकसान - RBI

देशातील पाच राज्यांमध्ये मिळून अडीच लाख कोटीचे बँकिंग घोटाळे झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : गेल्या सात वर्षात भारतात झालेल्या बँक घोटाळ्यांचे मोठे आणि गंभीर परिणाम भारताला सध्या भोगावे लागत आहेत. भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) याबाबत माहिती दिली आहे. या घोटाळ्यांमुळं भारताचं दररोज १०० कोटींचं नुकासान होतं आहे, असं आरबीआयनं म्हटलं आहे. (India loses Rs 100 crore to banking fraud every day)

आरबीआयकडील डेटाच्या माहितीनुसार, या बँक घोटाळ्यांमधील एकूण रक्कमेमध्ये दर वर्षाला घट होत असली तरी भारताच्या तिजोरीचं दररोज १०० कोटी रुपयांचं नुकसान होतं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र या यादीत अव्वल स्थानावर आहे. जिथं घोटाळ्यातील ५० टक्के पैशाचा समावेश आहे. त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये मिळून सुमारे २ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे बँक घोटाळे झाले आहेत. एकूणच ८३ टक्के पैसा हा या आर्थिक घोटाळ्यांमध्ये आहे. या सर्व राज्यांमध्ये मिळून १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात २.५ लाख कोटी रुपयांचे बँकिंग घोटाळे समोर आले आहेत. पण, अर्थ मंत्रालयानं असंही म्हटलं आहे की, बँकिंग घोटाळ्यांसंदर्भात त्वरित अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दरवर्षी फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

आरबीआयनं या बँक घोटाळ्यांची आठ विविध प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये गैरवापर आणि गुन्हेगारी विश्वासाचे उल्लंघन, बनावट साधनांद्वारे फसवं रोखीकरण, हिशोबाच्या पुस्तकांमध्ये फेरफार किंवा काल्पनिक खात्यांद्वारे मालमत्तेचे रूपांतरण, बक्षीस किंवा बेकायदेशीर तृप्तीसाठी वाढवलेली अनधिकृत क्रेडिट सुविधा, निष्काळजीपणा आणि रोख कमतरता, फसवणूक आणि फसवणूक, परकीय चलन व्यवहारातील अनियमितता आणि इतर कोणत्याही प्रकारची फसवणूक (वरीलप्रमाणे विशिष्ट शीर्षकाखाली येत नाही) या प्रत्येक श्रेणी अंतर्गत घोटाळ्यांची माहिती यापूर्वी सहज उपलब्ध होत नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT