job creation has reduced by 16 lakhs due to Inflation 
अर्थविश्व

मंदीमुळे रोजगार निर्मितीत घट; 16 लाख नोकरीच्या संधी गमावल्या

वृत्तसंस्था

देशातील मंदीसदृश परिस्थितीचा मोठा फटका रोजगारनिर्मितीवर झाला असून चालू आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 16 लाख रोजगार कमी झाले आहेत. एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मागील वर्षी एकूण 89.7 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. देशातील बहुसंख्य तरुणांना राजुगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या 15 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न मिळत असलेली क्षेत्रे आणि सरकारी नोकऱ्या यांचा विचार या अहवालात करण्यात आला आहे.

या अहवालानुसार महाराष्ट्र,  गुजरात आणि पंजाब या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या. मात्र, याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचे समोर आले आहे. परिणामी नोकरी निमित्ताने आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा सारख्या राज्यांमधून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांकडून  घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत देखील मोठी घट झाल्याचे म्हटले आहे.

कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न आणि ग्राहकांची खरेदीशक्ती ही येत्या काही काळासाठी अपेक्षेपेक्षा देखील कमीच राहिला असे देखील बँकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांच्या नैतृत्वाखाली तयार केलेल्या अहवालात म्हणटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर सुळेंचा कुमावतांना फोन; परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण

Dombivli Politics: 'मोदी भेटीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक'; ठाण्यात भाजप-शिंदे गटात सूक्ष्म सत्तासंघर्ष..

MPSC Result: सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले; ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Shivraj Singh Chouhan : एक-दोन रुपये पीकविमा मिळणं ही थट्टा! अकोल्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल...

आनंदाची बातमी! सोलापुरातील १९ विद्यार्थी झाले सीए; १०८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, राज्यात वाजताेय डंका..

SCROLL FOR NEXT