atmanirbhar bharat package, Rs 20 lakh cr Covid packages, Nirmala Sitharaman  
अर्थविश्व

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोदी सरकार रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणार

सकाळ डिजिटल टीम

Nirmala Sitharaman Announcement  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड 19 संदर्भातील 20 लाख कोटी पॅकेजसंदर्भात चौथ्यांदा पत्रकार परिषदेला संबोधित केले. यापूर्वीच्या तिसऱ्या टप्प्यात त्यांनी कृषीविषयक घटकावर भर दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्यांनी गुंतवणूक वाढीसह रोजगार निर्मितीवर भर दिल्याचे पाहायला मिळाले. शेतीविषयक 11 घोषणा केल्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुंतवणूक आणि रोजगार वाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतरही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दुसरीकेड लॉकडाउनमुळे उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. 

जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करताना मोदी सरकारसमोर खूप मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्यांदा देशवासियांना संबोधित करताना अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने आतापर्यंतचे सर्वात मोठे आपतकालीन पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजमधून कोणत्या घटकांना कशी मदत केली जाणार याची घोषणा अर्थमंत्र्यांकडून टप्प्याटप्याने करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाअंतर्गत केलेल्या पॅकेजची रक्कम ही देशाच्या जीडीपीच्या जवळपास 10 टक्के इतकी आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीच्या काळात केलेल्या 1.70 लाख कोटी रुपयाच्या मदत निधीचाही समावेश आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT