Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman  Sakal
अर्थविश्व

भारतात खूप काही महागाई नाही - निर्मला सीतारमन

सकाळ डिजिटल टीम

महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. मात्र भारत सरकार आणि त्यांचे मंत्री महागाईवर लोकांना दिलासा मिळेल असे निर्णय घेताना दिसत नाही. दुसरीकडे किराणा सामनापासून गाडी भाडे यासह इतर वस्तूंची भाववाढ झाली आहे. जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे. मात्र सामान्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अजब प्रतिक्रिया महागाईवर (Inflation) दिली आहे. भारतात महागाईचा दर खूप जास्त नाही, अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली आहे. त्या अमेरिकेतील वाॅशिग्टन डीसी येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. आमच्यासमोर आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत. (Nirmala Sitharaman Reaction On Inflation In India)

त्यामुळे तेलाच्या किंमती असो किंवा वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडत आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. मात्र या व्यतिरिक्त भारतात महागाई दर ६.९ टक्के आहे. आमचे लक्ष्य ४ टक्के आहे. यात २ टक्के अधिक किंवा कमी होण्याची शक्यता आहे. या प्रमाणे आम्ही ६ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. आम्ही ६ टक्क्यांची पातळी पार केली आहे. मात्र आम्ही त्यापेक्षा फार पुढे गेलेलो नाहीत.

राष्ट्रीय सांख्यकी कार्यालयाच्या (NSO) विदानुसार किरकोळ महागाई मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांवर गेली होती. ती १७ महिन्यांमध्ये सर्वात जास्त किरकोळ महागाई होती. सीतारामन म्हणाल्या, वाढत्या किंमतीचा बोजा सामान्यांवर पडत आहे. जेव्हा कोरोनाचा फटका बसला तेव्हा पायाभूत सुविधा उभारणीसाठी खर्च करणे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगला पर्याय ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT