Nirmala Sitharaman  Sakal
अर्थविश्व

भारतात खूप काही महागाई नाही - निर्मला सीतारमन

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांच्याकडून दिलासा मिळण्याऐवजी...

सकाळ डिजिटल टीम

महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. मात्र भारत सरकार आणि त्यांचे मंत्री महागाईवर लोकांना दिलासा मिळेल असे निर्णय घेताना दिसत नाही. दुसरीकडे किराणा सामनापासून गाडी भाडे यासह इतर वस्तूंची भाववाढ झाली आहे. जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे. मात्र सामान्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अजब प्रतिक्रिया महागाईवर (Inflation) दिली आहे. भारतात महागाईचा दर खूप जास्त नाही, अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली आहे. त्या अमेरिकेतील वाॅशिग्टन डीसी येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. आमच्यासमोर आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत. (Nirmala Sitharaman Reaction On Inflation In India)

त्यामुळे तेलाच्या किंमती असो किंवा वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडत आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. मात्र या व्यतिरिक्त भारतात महागाई दर ६.९ टक्के आहे. आमचे लक्ष्य ४ टक्के आहे. यात २ टक्के अधिक किंवा कमी होण्याची शक्यता आहे. या प्रमाणे आम्ही ६ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. आम्ही ६ टक्क्यांची पातळी पार केली आहे. मात्र आम्ही त्यापेक्षा फार पुढे गेलेलो नाहीत.

राष्ट्रीय सांख्यकी कार्यालयाच्या (NSO) विदानुसार किरकोळ महागाई मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांवर गेली होती. ती १७ महिन्यांमध्ये सर्वात जास्त किरकोळ महागाई होती. सीतारामन म्हणाल्या, वाढत्या किंमतीचा बोजा सामान्यांवर पडत आहे. जेव्हा कोरोनाचा फटका बसला तेव्हा पायाभूत सुविधा उभारणीसाठी खर्च करणे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगला पर्याय ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT