Piyush Goyal 
अर्थविश्व

'कोरोनाच्या परिणामानंतरही अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे स्पष्ट संकेत'

सूरज यादव

भारताचा निर्यातीतसुद्धा वृद्धी दर चांगला असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाजही पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारताची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, भारत चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुक सुरुच ठेवणार आहे. कोरोनाचा परिणाम आणि जागतिक पातळीवर गुंतवणुकीचे प्रमाण कमी असूनही 2020 मध्ये भारताला सर्वाधिक एफडीआय मिळाले.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशात एफडीआयचे प्रमाण 19 टक्क्यांनी वाढून 59.63 अब्ज डॉलर इतके झाले. तसंच इक्विटी, पुनर्गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न मिळून एकत्रीत एफडीआय गेल्या आर्थिक वर्षात 10 टक्के वाढून 81.72 अब्ज डॉलर इतके झाले. 2019-20 मध्ये ही आकडेवारी 74.39 अब्ज डॉलर होती. पीयूष गोयल यांनी सीआयआय होरासिस इंडियाने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये सांगितलं की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, या वर्षीही आपण परदेशी गुंतवणुकीत सलग सातव्या वर्षी ऐतिहासिक उच्चांक गाठण्याची पंरपरा कामय ठेवू.

भारताचा निर्यातीतसुद्धा वृद्धी दर चांगला असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाजही पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. 1 ते 21 जुलै या कालावधीत 22 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. महिन्याच्या अखेरपर्यंत ही निर्यात 32 ते 33 डॉलर्सच्या वर पोहोचेल. विकासाभिमुख सुधारणांमुळे भारताला आर्थिक परिवर्तनासाठी सक्षम केलं आहे आणि याचाच परिणाम म्हणजे भारत उत्पादन वाढवण्यात आणि मागणी पूर्ण करण्यामध्ये पुढे जात असल्याचं गोयल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT