Astro Tips
Astro Tips  Esakal
संस्कृती

Astro Tips: या दोन दिवशी अगरबत्ती लावल्यास होऊ शकते तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात देवाची पूजा करताना अगरबत्ती, धूपबत्ती लावण्याची परंपरा आहे. अगरबत्ती ही शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की, सकाळ-संध्याकाळ घरात अगरबत्ती लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते, घरात सुख-समृद्धी टिकून राहते, परंतु वास्तुशास्त्रात अगरबत्तीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. रोज सकाळी देवतांच्या पूजा-विधी वेळी अगरबत्ती वापरली जात असली तरी आठवड्यातील दोन दिवशी अगरबत्ती वापरण्यास मनाई आहे. असे केल्याने घरातील शांती-समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊ या आठवड्यातील कोणत्या दिवशी अगरबत्ती लावू नये याविषयीची सविस्तर माहिती..

सुरूवातीला पाहू या अगरबत्ती लावण्याचे फायदे...

1) अगरबत्ती लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि वातावरण सकारात्मक राहते. 

2) अगरबत्ती लावल्याने देवताही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने सुख-समृद्धी प्राप्त होते. 

3) अगरबत्तीचा धूर हवा शुद्ध करतो आणि हानिकारक जीवाणू नष्ट करतो. 

4) अगरबत्ती व्यतिरिक्त, धूपबत्ती, कापूर लावून देवाची पूजा करणे देखील शुभ आहे.

आता बघू या कोणत्या दिवशी अगरबत्ती लावू नये.. ज्योतिषशास्त्रानुसार, अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. वास्तूनुसार, घरामध्ये बांबूच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. परंतु रविवारी आणि मंगळवारी बांबू जाळण्यास शास्त्रात निषिद्ध मानले जाते. 

कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकते?

1) रविवारी आणि मंगळवारी अगरबत्ती लावू नये, असे केल्याने मानसिक आणि आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे घरात गरिबी येते आणि कुटुंबात तणाव राहतो, असे मानले जाते.

2) पौराणिक शास्त्रानुसार मंगळवार आणि रविवारी बांबू जाळल्याने संततीची हानी होण्याचा धोका असतो. 

3) मंगळवार आणि रविवारी या दिवशी बांबू जाळल्याने पितृदोष होतो, त्यामुळे कुटुंबात सुख-शांती राहत नाही. बांबू जाळल्याने दुर्दैव येते. 

4) तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागेल, त्यामुळे या दोन दिवशी शास्त्रात अगरबत्ती जाळण्यास मनाई आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT