Hindu Religion esakal
संस्कृती

Hindu Religion : हिंदू धर्मात चार धामांचं काय आहे महत्व? जाणून घ्या सविस्तर

Char Dham Yatra Mahatva: हिंदू धर्मात चार धामचे महत्व काय आहे ते जाणून घेऊयात.

साक्षी राऊत

Hindu Religion : चार धाम यात्रेबाबत तुम्ही ऐकलेच असेल. हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्व आहे. भारतात स्थित चार धाम चार दिशेला आहेत. तेव्हा हिंदू धर्मात चार धामचे महत्व काय आहे ते जाणून घेऊयात.

बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूला समर्पित आहे. याची स्थापना भगवान रामाने केली असे मानले जाते. बद्रीनाथ धामचे दरवाजे एप्रिलच्या शेवटच्या महिन्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला उघडले जातात तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बंद केले जातात.

Badrinath

रामेश्वर धाम हे भोलेनाथांना समर्पित असलेले धाम तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्रकिनारी वसलेले आहे. याशिवाय हे धाम १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.

Rameshwar Dham

पुरी धाम भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्री कृष्णाला समर्पित हे धाम ओडिशातील पुरी शहरात आहे. या मंदिराची पवित्र रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. मंदिरातील मुख्य देवता भगवान जगन्नाथ, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा आहेत.

द्वारका धाम हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेले पवित्र निवासस्थान गुजरातच्या पश्चिम टोकाला आहे. तीर्थ पुराणानुसार द्वारका धाम मोक्ष देणार्‍या सात पुरींपैकी एक मानली गेली आहे.

वेद आणि पुराणात चार धाम यात्रा अत्यंत शुभ मानली गेली आहे. चारधामची यात्रा करणाऱ्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. यासोबतच आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. हिंदू धर्मात चार धाम यात्रेचे दोन प्रकार आहेत. (Hindu Religion)

एक बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट देण्यासाठी आणि दुसरे बद्रीनाथ, जगन्नाथ, रामेश्वरम आणि द्वारका धामला. ही सर्व पवित्र स्थळे देशाच्या विविध भागात आहेत, त्यामुळे याला बडा चार धाम यात्रा असेही म्हणतात.

डिस्क्लेमर : या लेखात दिलेल्या माहितीची सकाळ समुह पुष्टी करत नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT