Hindu Rituals esakal
संस्कृती

Hindu Rituals : लग्नानंतर महिला चांदीचेच जोडवे का घालतात, सोन्याचे का नाही? हे आहे कारण

हिंदू धर्मातील जवळजवळ सर्व लोकांना हेही माहिती आहे की लग्नानंतर स्त्रिया त्यांच्या पायांतील बोटांत जोडवे घालतात. मात्र यामागचे कारण तुम्हाला माहितीये काय?

साक्षी राऊत

Hindu Rituals : हिंदू धर्मात लग्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्न म्हणजे एक पवित्र नातं. लग्नाची सर्व तयारी अगदी फार पूर्वीपासूनच सुरू होते. अगदी कुंडली जुळेपर्यंत ते मुला-मुलीचे गुण जुळेपर्यंत सगळं बघितल्या जातं. वैवाहिक जीवनात विघ्न येऊ नये म्हणून विद्वान पंडिताचा सल्लाही घेतला जातो. हिंदू धर्मातील जवळजवळ सर्व लोकांना हेही माहिती आहे की लग्नानंतर स्त्रिया त्यांच्या पायांतील बोटांत जोडवे घालतात. मात्र यामागचे कारण तुम्हाला माहितीये काय?

जोडवे घालणे ही प्रथा असली तरी आता फॅशन बनली आहे. विवाहित स्त्रीचे हे सर्वात मोठे लक्षण आहे. वधूच्या श्रृंगाराचा हा महत्वाचा भाग मानला जातो. लग्नानंतर, वधूला जोडवे घालण्यास सांगितले जाते कारण ते सुखी वैवाहिक जीवनाचे लक्षण असते.

ज्योतिष काय सांगतात?

ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी असेही म्हटले आहे की पत्नीने आपल्या पतीशी चांगले संबंध ठेवण्यासाठी, तिने दोन्ही पायांच्या दोन किंवा तीन बोटांमध्ये जोडवे घालावे. जोडवे धारण केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहो, म्हणून चांदीच्या अंगठ्या घालणे फार महत्वाचे आहे. त्याचा संबंध रामायणाशी जोडला जातो. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा तिने आपल्या जवळील वस्तू वाटेत फेकून दिल्या होत्या. भगवान श्रीरामांना सहज शोधता यावं म्हणून त्यांनी हे केलं. (sanskruti)

पायात चांदीचीच जोडवी का घालावी?

महिलांनी मधल्या बोटात जोडवी घालावी. हे बोट थेट हृदयाशी संबंधित आहे. या बोटात चांदीचे जोडवे धारण केल्याने तुमचा चंद्र मजबूत होतो. पती-पत्नीच्या जीवनात शांतता नांदते. तसेच चांदी शरीरासाठी उत्तम धातू मानला जातो. हा धातू नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT