Esakal  Trimbakeshwar Temple
संस्कृती

ज्योतिर्लिंग: कालसर्प पूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा नेमका इतिहास काय आहे?

हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात.

दिपाली सुसर

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिकपासून 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसविण्यात आले आहे. अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात.

त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे, पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या चारही बाजूला चार दरवाजे आहेत. पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्य असेल तेव्हाच उघडला जातो, बाकी दिवस भक्त इतर तीन दरवाज्यांतून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात.

त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना कशी आहे ?

त्र्यंबकेश्वर येथे असलेल मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेलं आहे. मंदिराची रचना अप्रतिम असून आकर्षक आहे. मंदिरात असलेल्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. हे शिवलिंग आपल्याला डोळ्यांच्या आकाराचे दिसतात आणि त्यामध्ये पाणी भरलेले असते जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात त्या लिंगांना ब्रम्हा,विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते. हे मंदिर कालसर्प पूजेसाठी आणि निधनानंतरच्या विधीसाठी जास्त प्रसिद्ध आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराची कहाणी काय आहे ?

प्रचलित आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्येचे पती ऋषी गौतम यांनी वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. या परिसरात असे अनेक ऋषी होते जे गौतम ऋषींचा हेवा करत होते आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते. एकदा सर्व ऋषींनी गौतम ऋषींवर गायींच्या हत्येचा आरोप केला. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गंगा देवीला येथे आणावे लागेल, असे सर्वांनी सांगितले. त्यानंतर गौतम ऋषींनी शिवलिंगाची स्थापना करून पूजा सुरू केली. ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आणि माता पार्वती तेथे प्रकट झाले. देवाने वरदान मागायला सांगितले. तेव्हा गौतम ऋषींनी गंगा देवीला त्या ठिकाणी पाठवण्यासाठी शिवाकडे वरदान मागितले. देवी गंगा म्हणाली की, जर शिव देखील या ठिकाणी थांबले तर ती देखील येथेच राहील. भगवान शिवाने गंगेच्या विनंतीवरून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे वास्तव्य करण्याचे मान्य केले आणि गंगा नदी गौतमीच्या रूपाने तेथे वाहू लागली. गोदावरी हे गौतमी नदीचे नाव आहे.गोदावरीच्या उगमासह शिवशंभून आपल्या वास्तव्यासाठीही होकार दिला. त्र्यंबक ऋषींमुळेच या मंदिराला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather : उत्तर भारतात शीत लहर, राज्यात थंडीचा कडाका वाढला वर्षाखेरीसपर्यंत हुडहुडी कायम राहणार

Personal Loan: जर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावे लागेल? पर्सनल लोनचे 'हे' नियम तुम्ही वाचलेत का?

Drugs Racket : बंगळूरमधील ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त; आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवणार

China Railway Speed : दोन सेकंदांतच रेल्वेचा वेग ताशी ७०० किमीवर; चीनमध्ये ‘मॅगलेव्ह’ तंत्रज्ञानाची किमया

SCROLL FOR NEXT