Kaal Sarp Dosh Sakal
संस्कृती

Kaal Sarp Dosh : तुमच्याही कुंडलीत आहे काल सर्प दोष? जाणून घ्या दूर करण्याचा सोपा उपाय

जन्मासोबतच व्यक्तीच्या कुंडलीत अनेक योग येतात. यापैकी काही योग शुभ असतात तर, काही अशुभ.

सकाळ डिजिटल टीम

Kaal Sarp Dosh : जन्मासोबतच व्यक्तीच्या कुंडलीत अनेक योग येतात. यापैकी काही योग शुभ असतात तर, काही अशुभ. तर काही योग संमिश्र परिणाम देतात. काही व्यक्ती सर्व सुखसोयी असूनही अस्वस्थ असतात. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत काही दोषांमुळे असे घडते. यातील एक योग म्हणजेच काल सर्प योग होय.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

जर, कुंडलीत काल सर्प दोष असेल तर व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कुंडलीत हा योग असेल तर, संबंधित व्यक्ती नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटाने वेढलेली असते. आज आम्ही तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास कोणती लक्षणं दिसतात आणि त्याचा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत.

कालसर्प दोषात काय होतं?

जर कुंडलीत कालसर्प दोष असेल तर व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. कालसर्प दोषामुळे व्यक्ती नेहमी शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहते. काहींना या दोषामुळे संततीविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. यामध्ये एखाद्याला मूल होत नाही किंवा मुलाच्या आरोग्याच्या समस्या असू शकतात. कालसर्प योग असणाऱ्या व्यक्तीला नेहमी नोकरीतही अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच या व्यक्ती नेहमी कर्जाच्या डोंगराखाली असते. कुंडलीत काल सर्प योग असल्यास ज्योतिषांच्या सल्ल्याने त्याचे निवारण करावे.

कालसर्प दोष दूर करण्याचे उपाय

ज्योतिष शास्त्रात काल सर्प दोष दूर करण्याचे अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. जर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असल्यास घरात मोरपंखाचा मुकुट घातलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करावी. तसेच या मूर्तीची दररोज पूजा करत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो वासुदेवाय कृष्णाय नमः शिवाय असा जप करावा. असे नियमित केल्याने कालसर्प दोषाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

काल सर्प योगामुळे नोकरीत अडचण येत असल्यास किंवा नोकरी मिळत नसल्यास पलाशचे फूल गोमूत्रात बुडवून त्याचे बारीक पावडर बनवावी. त्यात चंदनाची पावडर मिसळून शिवलिंगावर त्रिपुंडाचा आकार तयार करावा. हा उपाय साधारण 21 दिवस केल्याने वारंवार नोकरीत येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

याशिवाय कुंडलीत कालसर्प दोषामुळे अनेकांना वारंवार राग येतो. हा राग शांत करण्यासाठी गोड दुधात भांग टाकून रोज शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने राग शांत होतो. याशिवाय महामृत्युंजय मंत्राचा दररोज जप केल्यानेदेखील काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT