हायलाइट्स
मंदिरात रिकामा कलश घेऊन जाणे अशुभ मानले जाते.
मंदिरातून परत येताना कलशात थोडेसे पाणी असू द्यावे.
पूजा विधींशी निगडीत नियमांचे नक्की पालन करा
हिंदू धर्मात पूजापाठला विशेष महत्व आहे. लोक घरी , मंदिरात जाऊन देवपूजा करतात. असे मानले जाते की, मंदिरात जाऊन पूजा केल्याने आत्मिक शांती मिळते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. पण मंदिरात जाऊन पूजा करण्याचे काही नियम असतात. पूजेचे फळ मिळावे, आणि जीवन सुखमय होण्यासाठी या नियमांना पाळणे आवश्यक असते. मंदिरात पूजा करताना काही चुक झाली तर त्याला अशुभ समजले जाते. म्हणून पूजेशी संबंधीत हे नियम माहित असणे आवश्यक असते.
मंदिरात पूजेला जाताना पूजा साहित्यासोबत कलश घेऊन जातात. पण कधीही रिकामा कलश घेऊन जाऊ नये. जाणून घेऊया रिकामा कलश का नेऊ नये?
पूजेसाठी जेव्हाही मंदिरात जातात तेव्हा एक कलश नक्की घेऊन जा. पण एका गोष्टीची कायम काळजी घ्या की, कलश नेहमी भरून न्यावा. नेताना पाणी सांडेल, मंदिरात जाऊन भरूया असा विचार करून रिकामा कलश नेऊ नये. रिकामा कलश नेल्याने आपल्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. आणि पूजेचे पूर्ण फळही मिळत नाही.
मंदिरातून रिकामा कलश परत आणू नये
मंदिरात जाताना किंवा परत येताना रिकामा कलश आणू नये. पूजेनंतर थोडे पाणी वाचवून घरी आणायला हवे. ते पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे घरात सकारात्मकता वाढते व आर्थिक स्थितीला मजबूती मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.