Pitru Paksh
Pitru Paksh esakal
संस्कृती

Pitru Paksh: पितृपक्षात देवतांची पूजा योग्य की अयोग्य? शास्त्र जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Pitru Paksha 2022 : अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू झाला आहे आणि आश्विन महिन्याच्या अमावास्येला म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी समाप्त होईल. पितृ पक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पितरांचे पूजनीय स्मरण करून त्यांचे श्राद्ध कर्म केले जाते. श्राद्ध हे केवळ पितरांच्या मुक्तीसाठीच नाही तर त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठीही केले जाते.

धार्मिक मान्यता आणि पौराणिक शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये सर्व प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य आहेत. धर्मग्रंथांमध्ये देवी-देवतांच्या पूजेबरोबरच पितरांची पूजाही निषिद्ध मानण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पितृ पक्षात देवदेवतांची पूजा करावी की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. त्याबद्दल जाणून घेऊया.

शास्त्रानुसार पितृपक्षात पितरांचा वास पृथ्वीवर असतो. अशा स्थितीत या काळात पितरांची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. पण पितृपक्षात देवतांची पूजा करावी की नाही? शास्त्रानुसार पितृपक्षात नेहमीप्रमाणे पूजा करावी. जरी या काळात आपल्या पूर्वजांची पूजा नक्कीच केली जाते, परंतु ते देवापेक्षा उच्च नाहीत. म्हणूनच या काळात देवतांची पूजा करावी.

पितृपक्षात देवतांची पूजा केल्याशिवाय श्राद्ध, पिंड दान इत्यादीचे फळ मिळत नाही हे लक्षात ठेवा. म्हणूनच पितृपक्षात सकाळी स्नान केल्यानंतर नेहमीप्रमाणे देवतेची पूजा करावी.

पितृ पक्षातील पितृ दोष दूर करण्याचे उपाय

पितृदोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. अमावस्येच्या दिवशी पिंपळावर पाण्या सोबत फुले, अक्षदा, दूध आणि काळे तीळ अर्पण करा. पितृदोष दूर करण्यासाठी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंड दान करावे. दक्षिण दिशेला पितरांचे फोटो लावून त्यांची रोज पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT