Pitru Paksha 2022 esakal
संस्कृती

Pitru Paksha 2022 : पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी 'या' गोष्टी आहेत आवश्यक

पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी तिथीचा मुहूर्त काय आणि श्राद्धासाठी कोणते साहित्य लागते. ते जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Pitru Paksha 2022 Tritiya Tithi Shradha : १० सप्टेंबरला पितृपक्ष सुरु झाले. याच पितृ पक्षाच्या तृतीया तिथीचे श्राद्ध आज (१२ सप्टेंबर) आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात या गोष्टींशिवाय श्राद्ध करणे अपूर्ण मानले जाते. पितृपक्षातील तृतीया श्राद्धासाठी तिथीचा मुहूर्त काय आणि श्राद्धासाठी कोणते साहित्य लागते. ते जाणून घ्या.

श्राध्द तिथी

  • अश्विन कृष्ण तिसरी तिथी सुरूवात : १२ सप्टेंबर २०२२, सकाळी ११.३५ पासून

  • अश्विन कृष्ण तिसरी तिथी समाप्त : १३ सप्टेंबर २०२२, सकाळी १०.३७ पर्यंत

तिसरी तिथी श्राद्ध मुहूर्त

  • कुतुप मुहूर्त : सकाळी ११.५८ वाजता ते दुपारी १२.४८पर्यंत

  • रौहीन मुहूर्त : सकाळी १२.४८ वाजता ते दुपारी १.३७ पर्यंत

  • अपराह्न काळ : सकाळी १.३७ वाजता ते सायंकाळी ४.०६ पर्यंत

श्राद्धसाठी लागणारे साहित्य :

पितृपक्षात या गोष्टींशिवाय श्राद्ध करणे अपूर्ण मानले जाते. श्राद्ध कर्मामध्ये तीळ, दर्भ, तांदूळ किंवा जव आणि तुळशी असणे फार महत्वाचे आहे.

दर्भ : हिंदू धर्मात दर्भ (एक विशेष प्रकारचे गवत) अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जाते. श्राद्ध करताना अनामिकामध्ये दर्भापासून बनवलेली अंगठी, ज्याला पवित्री असेही म्हणतात, घालण्याचा नियम आहे. ते धारण करून श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दर्भाच्या पहिल्या भागात ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात महादेव वास करतात.

तीळ : बृहन्नार्दीय पुराणानुसार श्राद्ध पक्षात आणि पिंड दानाच्या वेळी तीळ वापरल्याने पितरांना शांती मिळते. मान्यतेनुसार अकाली निधन झालेल्या नातेवाईकांच्या पाण्यात काळे तीळ मिसळून श्राद्ध केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो. धार्मिक ग्रंथानुसार तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामापासून झाली आहे. असे मानले जाते.

तुळशी : तुळशी अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. तुळशीचा वास पितरांना प्रसन्न करतो आणि त्यांचा आत्मा चिरंतन तृप्त राहतो, असे मानले जाते.

तांदूळ : पितृ पक्षात तांदळाची खीर बनवण्याची परंपरा आहे. तांदूळ हे संपत्ती आणि शीतलतेचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की तांदळाचे गोळे या हेतूने बनवले जातात की ते पितरांना थंडावा देतात आणि त्यामुळे त्यांचा आत्मा दीर्घकाळ तृप्त होतो. भात नसेल तर जवाचे गोळेही बनवले जातात. जव हे सोन्यासारखे शुद्ध मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT