Surya Grahan 2022 esakal
संस्कृती

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहण काळात भोजन का करु नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

सकाळ डिजिटल टीम

Surya Grahan 2022 : यंदा वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला मंगळवारी आहे. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, ज्याचा प्रभाव पृथ्वीवरील सजीवांवर दिसून येतो. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाच्या नियमांबद्दल माहिती सांगितली आहे. ज्योतिष अभ्यासक विजय जोशी सांगतात ग्रहणकाळात अशी अनेक कामे असतात, जी टाळावीत. त्यापैकी एक म्हणजे ग्रहण काळात भोजन करणे.

(Surya Grahan 2022 scientific reason to not eat food during solar eclipse)

धार्मिक पुराणातील उल्लेखानुसार असे मानले जाते की ग्रहण काळात मनुष्य जेवढे जास्त धान्य खाईल, त्याला तेवढी वर्षे नरक यातना भोगावी लागतील. याशिवाय ग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्याने व्यक्तीला पोटाचे आजार होतात, असेही नमूद आहे.

याशिवाय ग्रहणाच्या काही वेळाआधी पाण्याच्या सर्व स्त्रोतांवर दर्भ ठेवावे व पाण्यात तुळशीची पाने टाकावीत. ग्रहण संपल्यानतंर आंघोळ करावी व त्यानंतरच जेवण करावे. कारण ग्रहणाच्या वेळी वातावरणात असलेले बॅक्टेरिया तुमच्या शरीरावर साचतात. आंघोळ केल्याने हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरावरुन निघून जातील.

ग्रहण काळात जेवण करुन नये याला वैज्ञानिक आधार देखील आहे. ग्रहणाच्या वेळी वातावरणात येणार्‍या अतिनील किरणांमुळे (UV Rays) अन्न विषारी होते हे वैज्ञानिक चाचण्यांमध्ये समोर आले आहे. म्हणून बहुतेक लोक ग्रहण काळात उपवास करतात तथा करावा.

जरी ग्रहण काळात अन्न खाण्यास मनाई आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये काही लोकांना खाण्याची सवलत दिली जाऊ शकते. यात वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला किंवा रुग्ण अन्न घेऊ शकतात मात्र यांनी अन्न घेताना त्यात तुळशीची पाने जरुर टाकावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT