Vastu Tips Sakal
संस्कृती

Vastu Tips : तुम्हीदेखील जेवताना ताटात तीन पोळ्या घेता? तर, आताच...

हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीला काही विशिष्ट समजुती आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : शास्त्रात अनेक गोष्टी करू नये असे सांगण्यात आले आहे. एवढेच काय तर, आपल्यापैकी अनेकांच्या घरात ज्येष्ठांना सांगताना ऐकले असेल की, जेवताना ताटामध्ये तीन पोळ्या वाढू नये. तसेच प्रसादातही तीन फळं दिली जात नाही.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

असं न करण्यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत अनेकांना माहिती नाही. हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीला काही विशिष्ट समजुती आहेत, ज्या आपल्याला आपल्या वडिलांकडून ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला ताटात का तीन पोळ्या वाढू नये याबाबत सांगणार आहोत.

ताटात का वाढू नये तीन पोळ्या?

असे मानले जाते की, ताटात तीन पोळ्या वाढणे म्हणजे मृत व्यक्तीला जेवण दिल्या सारखे होते. अनेकदा तेराव्या विधीत मृत व्यक्तीसाठी काढलेल्या जेवणामध्ये 1 किंवा तीन पोळ्या ठेवल्याचे तुम्ही पाहिले असेल. अशा परिस्थितीत जिवंत व्यक्तीच्या जेवणात तीन पोळ्या देणे अशुभ मानले जाते.

तीन पोळ्या वाढण्याचे तोटे

ज्या व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या वाढल्या जातात. त्या व्यक्तीच्या मनात दुस-यांशी शत्रुत्वाची भावना निर्माण होते. केवळ पोळ्याच नव्हे तर, तीन लाडू, तीन फळे ताटात ठेवू नयेत. असे केल्याने व्यक्तीचे वयही कमी होते.

अशुभ मानला जातो तीन क्रमांक

प्राचीन काळापासून, पूजेच्या ग्रंथात देखील 3 क्रमांक अशुभ मानला गेला आहे. पूजेमध्ये किंवा प्रसादात 3 क्रमांकामध्ये कोणत्याही गोष्टी दिल्या जात नाही.

काय सांगते विज्ञान?

विज्ञानाच्यादृष्टीने अशी कोणतीच मोजदाद नाही, पण सामान्य माणसाला 1 वाटी वरण, भात आणि भाजीसोबत 2 पोळ्या सेवन करणे पुरेसे आहे, पण सामान्य माणसाला एक वाटी वरण, भात आणि भाजीसोबत दोन पोळ्या खाणे पुरेसे आहे, अशा स्थितीत तिसरी पोळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो तसेच आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT