Coconut Breaking Sakal
संस्कृती

Astrology : नारळ उभा फुटण्याचा अर्थ काय? शुभ की अशुभ...जाणून घ्या

आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात नारळ फो़डून केली जाते.

वैष्णवी कारंजकर

आपल्याकडे कोणतंही शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात नारळ फो़डून केली जाते. काही घरांमध्ये तर अमावस्या, पौर्णिमेलाही नारळ फोडला जातो. नारळ कसा फुटला, कसा निघाला, चव कशी आहे, या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र सांगितलं जातं.

आपल्याकडे नारळासंबंधित अनेक समजुती आहेत. म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं. नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला...म्हणजे चांगलं झालं. या अनेक समजुती कुठून आल्या, कशा आल्या हे मात्र सांगता येणं अवघड आहे. पण कधी तुम्ही पाहिलं आहे का...नारळ कायम मधून फुटतो. म्हणजे वरुन किंवा खालून फुटत नाही. याचं काय कारण?

जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो. नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो. नारळाची शीर त्याच्या मध्यभागी असते. त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे दोन भाग होतात. यामागे खरंतर असं विशेष कारण नाही. नारळ कितीही आपटला तरी तो उभा फुटत नाही. कारण त्यावर होणारा आघात मध्यभागी होतो. नव्या नारळाचं कवच कडक नाही तर ओलसर असतं. (Astro Tips)

नारळ फोडण्याची सोपी पद्धत

एका पॅनमध्ये पाणी तापवा. नारळ्याच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा. पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा. १०-१५ मिनिटांनंतर करवंटीचा रंग काळसर होतो. त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावं. त्यानंतर करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT