देश

डिप्रेशन झालंय नॉर्मल; ज्येष्ठ नागरिक विळख्यात 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रत्येक सात भारतीयांमागे एका व्यक्तीला मानसिक विकार जडला असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले असून, यामुळे नैराश्‍य आणि चिंता या सर्वसामान्य गोष्टी झाल्या असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ही आकडेवारी 2017 मधील आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानसिक विकारांबाबतची राज्यनिहाय नोंद "लॅन्सेट सायकीयाट्री' या नियतकालिकामध्ये 1990 पासून घेण्यात येत आहे. 1990 ते 2017 या काळात एकूण विकारांमध्ये मानसिक विकारांचे असलेले प्रमाण दुप्पट झाले असल्याचे या नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. या मानसिक विकारांमध्ये नैराश्‍य, अतिचिंता, स्किझोफ्रेनिया, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, स्वभावातील टोकाचे बदल, आत्ममग्नता यांचा समावेश आहे.

2017 मध्ये, भारतातील 19 कोटी 70 लाख जण मानसिक विकारग्रस्त होते, त्यापैकी चार कोटी 60 लाख जणांना नैराश्‍य, तर साडेचार कोटी जणांना अतिचिंतेने ग्रासले होते. हे दोन्ही अत्यंत सर्वसामान्य विकार झाले असून, तो होण्याचे प्रमाणही वाढत आहे. 

ज्येष्ठ नागरिक विळख्यात 
राज्यनिहाय विचार करता दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असून, त्यातही महिला या विकाराने अधिक प्रमाणात ग्रस्त आहेत. भारतातील वयोवृद्ध नागरिकांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, नैराश्‍यामुळे आत्महत्या करण्याची वृत्तीही बळावत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे हे विकार होऊ नये म्हणून परिणामकारक उपाय करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

अपघातात 2.2 लाख जणांचा मृत्यू 
"लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतात 2017 मध्ये रस्ते अपघातात दोन लाख वीस हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुरुषांचा कमी वयातच होणाऱ्या मृत्यूमध्ये रस्ते अपघात हे सर्वांत मोठे कारण आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांची संख्या निम्मी आहे. हे प्रमाण जागतिक आकडेवारीच्या तुलनेत अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT