india china
india china esakal
देश

तब्बल 13 तास चालली भारत-चीनमधील चर्चेची 14वी फेरी, काय घडले?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) लष्करी तणाव कमी करण्यासाठी आणि सामान्य स्थिती परत आणण्यासाठी भारत-चीन (india china) लष्करी कॉर्प्स कमांडर-स्तरीय चर्चेची 14 वी फेरी (14th round of Corps Commander Level Talks) बुधवारी चुशुल-मोल्डो येथे पार पडली. ही चर्चा काल (ता.१२) सुमारे 13 तास चालली आणि रात्री 10:30 वाजता संपली.

सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय बाजूचे प्रतिनिधित्व 14 कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी केले. चीनने मंगळवारी सांगितले की, भारतासोबतच्या सीमावर्ती भागातील सद्यस्थिती “सामान्यत: स्थिर” आहे आणि त्याने पूर्व लडाखमधील संघर्षाच्या उर्वरित भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी बुधवारी कोर कमांडर-स्तरीय 14 व्या फेरीची चर्चा होणार असल्याची पुष्टी केली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, 20 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर दोन्ही बाजूंच्या लष्करी चर्चेच्या 14 व्या फेरीपूर्वी भारत पूर्व लडाखमध्ये उर्वरित संघर्षाच्या ठिकाणांच्या समस्या सोडवण्यासाठी चीनसोबत फलदायी संवादाची अपेक्षा होती.

10 ऑक्टोबर 2021 रोजी लष्करी चर्चेची 13 वी फेरी झाली होती. परंतू त्यात संघर्षावर तोडगा निघाला नव्हता. भारत आणि चीनने गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला डिजिटल राजनैतिक चर्चेत पूर्व लडाखमधील संघर्षाच्या उर्वरित भागातून सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लवकरच लष्करी चर्चेची 14 वी फेरी आयोजित करण्याचे मान्य केले होते.

पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील किनारी आणि गोग्रा परिसरात सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया दोन्ही बाजूंनी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या मालिकेमुळे गेल्या वर्षी पूर्ण झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या संवेदनशील भागात सध्या दोन्ही देशांचे सुमारे 50,000 ते 60,000 सैनिक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT