20 more congress leaders jammu kashmir congress resign in support of ghulam nabi azad  esakal
देश

'कॉंग्रेस'मधील राजीनामासत्र थांबेना! आणखी २० नेत्यांनी सोडला पक्ष

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यानंतर काँग्रेस पक्षाला लागलेली गळीती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. पक्षातून राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील आणखी 20 काँग्रेस नेत्यांनी आझाद यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

गुलाम नबी आझाद यांनी ऑगस्टमध्ये काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधींवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आझाद यांचा राजीनामा हा अलीकडच्या काळात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या आधी हिमाचल प्रदेशात, जिथे निवडणुका होणार आहेत, आनंद शर्मा यांनीही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा देणारे सर्व 20 सदस्य जम्मू उत्तर विभागाच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. या सर्वांनी पक्षाचे नेते राजिंदर प्रसाद यांच्यासह राजीनामे दिले. प्रसाद हा नौशेरा राजौरी येथील मास्टर बेली राम शर्मा यांचे पुत्र आहेत. आझाद यांच्याप्रमाणेच त्यांनीही पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षातील मंडळ व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे .प्रसाद यांनी लिहिले आहे की, आज पक्ष पूर्णपणे पॅराशूटच्या मदतीने येथे पोहोचणाऱ्यांनी घेरला आहे. त्यामुळे पक्ष सामान्य जनतेच्या वेदना आणि अडचणींपासून दूर होत आहे ज्यामुळे अडचणी वाढत आहेत.

यापूर्वी गुरुवारी काँग्रेसच्या 36 नेत्यांनीही आझाद यांना पाठिंबा दर्शवत पक्षाचा राजीनामा दिला होता. यामध्ये नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्षही सहभागी झाले होते. दुसरीकडे, पक्षाच्या 64 ज्येष्ठ नेत्यांनी आधीच काँग्रेस सोडली आहे. आझाद यांच्या पाठिंब्याच्या राजीनाम्यांची ही दीर्घ मालिका असल्याचे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यांनी राहुल गांधींवर काँग्रेसची अंतर्गत व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत त्यांना अपरिपक्व म्हटले होते.

आझाद यांनी सोनिया गांधींना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांचे वर्णन नाममात्र अध्यक्ष असे केले होते. पक्षाचे बहुतांश निर्णय राहुल गांधी यांचे सुरक्षा रक्षक आणि पीए घेतात असा आरोपही केला होता. गुलाम नबी आझाद नवीन राष्ट्रीय पक्ष काढण्याच्या तयारीत असून आझाद यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडलेले सर्व नेते येत्या काही दिवसांत आझाद यांनी सुरू केलेल्या नव्या पक्षात सामील होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT